NiKi

NiKi

Wednesday, January 18, 2012

तू गेलीस तेव्हा ' थांब ' म्हणालो नाही
'का जाशी ? ' ते ही ' सांग ' म्हणालो नाही
होतीस जरी बाजूस उभी  तू माझ्या
' हे अंतर आहे लांब ' म्हणालो नाही. . .

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पानी
' जा ! फिटले सारे पांग ! ' म्हणालो नाही. . .

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे !
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही. . .

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग – म्हणालो नाही. . .

हे श्रेय न माझे ! तुझेच देणे आहे !
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग – म्हणालो नाही. . .
ओठात सांजवेळी तु, सुर होऊनी येते
मोजुन श्वास माझे, माझे मलाच देते !!
सरी तुझ्या स्वरांच्या आसवांच्या ओळी
ओल्या सरीसवे तु, थेंब थेंब झरते !!
या भिजल्या स्वरांना देउ नकोस साद
भास द्याया पुरे गं, माझी मलाच गीते !!
मी मोजतो दुरावे, मी शोधतो पुरावे
अंतरही हात धरुनी मजला दुरात नेते !!
तो श्वास गुंतलेला, तो सुर संपलेला
ते इशारे क्षणांचे, सारे मलाच होते !!
त्या धुंदमंद राती, तुही नशाच होती
कोरडीच नशा आज, पेले माझेच रीते !!
कुणी म्हणेल वेडी तुला, कुणी म्हणेल वेडा मला
या वेडाची गोडी ठाऊक तुझी तुला
अन माझी मला ।

हे वेड जगावेगळे
ते जगास कुठूनी कळे
जगा वेगळा छंद लागला
तुझा तुला अन माझा मला ।

मज येईना बोलता
तुज साधेना सांगता
मुक्यासारखे बघती डोळे
तुझे मला अन माझे तुला ।

हे दोन जीवांचे कोडे
ते ज्यांचे त्या उलगडे
त्या कोड्याची कोड माहिती
तुझी तुला अन माझी मला ।
तुला पाहूनी माझे
असे गंधाळत जाणे
जणू उमललेल्या कळीचे
बेधुंद बहरत जाणे

तुलाच स्मरत मी
एकटक तुज पाहताना
चुकवीत नजरा तुझे
मज चोरून ते पाहणे

मज अजूनी आठवतो
तुझ्या डोळ्यांतला पाऊस
निघताना मी हळुवार
तुझ्या पापण्या ओलावणे

तुटते हृदय माझे
पाहते मी जेव्हा
लपवीत जखमा तुझे
ते मुग्ध मुग्ध हसणे

माझी झोळीही रिकामी
माझे हातही रिते रिते
कशी फेडू,किती फेडू?
तुझे नक्षत्रांचे देणे

Monday, January 16, 2012

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्य ा बटांना
मी अलगद सावरावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं
आठवण माझी आली कधी

तर पापण्या जरा मीटून बघ.

सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.
आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.
आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.
आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.
आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीव्ह्लन बघ.
आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.
अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,”बराच काही काळ तळपतोस

मग शेवटी असा का मावळतोस?”
सूर्य म्हणाला , “वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी,
तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !
आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस
पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !
रात्र : ” खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण

धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी !
मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय
एक हात तुला अन् एक हात त्यालाअसं बेधुंद जीवन जगायचंय !
सूर्य म्हणाला , “मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय ही धग खूप असह्य आहे ,
शांत होईतो चांदण्यात भिजायचंय !पण …..
आपल्याला असं वागता येणार नाही
तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं आणि…..
तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी…..”तो” येताच ,
मला असं विझायला हवं
मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही...
प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ............ ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" .......... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" .............. ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" ♥
 मिलन 

मनातल्या त्या हूर हुरीला, 
किती थांबवायचं ग..

मिलनाच्या त्या उत्कटतेला, 
किती लांबवायच ग.....

  
दररोज उद्या च्या आशेवर, 
किती जगायचं ग..


हातात रोज फोटो घेवून तुझा, 
किती पाहायचं ग ..


मनीच्या भावनांना काव्यात, 
किती गोवायचं ग ..


तुला स्पर्शून येणाऱ्या वाऱ्यांना,
किती विचारायचं ग ..


तुझ्या घराकडे जाणाऱ्या वाटेला,  
किती बघायचं ग...
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची

Saturday, January 14, 2012

तप्त उन्हात मिळालेली सावली म्हणजे तू,
तहानलेल्या ओठांना मिळालेला पाण्याचा एक थेंब म्हणजे तू ,
जगण्यासाठी मिळालेला एक श्वास म्हणजे तू ,
दृष्टी नसलेल्या डोळ्यांना मिळालेला आशेचा किरण म्हणजे तू ,
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
वाट चुकली कि सरळ मार्गाने नेणारा तू ,
माझ्या पायात काटा रुतला तरी स्वताचे लपवून अश्रू पुसणारा तू ,
पावसात भिजताना छत्री नसताना डोक्यावर हाथ ठेवणारा तू ,
माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी अगदी विदुषक झालेला तू ,
अजून कसे सांगू कि माझ्यासाठी कोण आहेस तू ,
माझा अर्धवट शब्द पूर्ण करणारा तू,
मी काहीच न बोलता समजून जाणारा तू ,
माझ्यासाठीच जगणारा तू , माझ्याशिवाय काहीच न समजणारा तू ,
माझे सर्वस्व आहेस तू ......फक्त तू
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस 
तू.......फक्त तू...
डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीहि विसरता विसरत नाही... 
भुरळ पडून जातेस ग तू मनाला, 
आणि सांज का हि होत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
डोळे मिटले असो किव्हा असो उघडे, 
तूच दिसतेस ग समोर, 
आणि दुसर कोणीच दिसत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
देवाला हि भुरळ पडून आलीस तू, 
मी तर फक्त एक कवी आहे, 
याच मातीने घडवलं त्याने ग मला... 

पण,
नक्की विचारेन जाऊन मी त्या देवाला,
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.....
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.

तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...
मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

...
स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही.. .
तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

... असावे इथे तू असे वाटताना पहावे इथे नेमके तू मला
उखाणे तुलाही उखाणे मलाही उखाणेच ते उलगडावे कुठे?

नशीबी जरी रोज असती उपेक्षा ..अपेक्षा कधी संपल्या का कुठे
शरीरास या श्वास उच्छवास सांगे तुला सोडुनी वावरावे कुठे?

दिसेना तुला मी - मला सांगते तू- क्षितीजा पुढे काय दिसते तुला?
परीघात फिरतो तुझ्या मी कधीही तुझ्यातून मी मावळावे कुठे?

तुला पाहिल्यावर तुझ्यातच हरवतो ठरवतो सदा होत जावे असे
कळावे तुझ्या मुग्ध अधरास तेव्हा असे जिंकणे नोंदवावे कुठे?

अरे जीवना काय देतोस धमक्या मला फक्त तू एवढे सांग रे
नडावे कशाला नडावे कुणाशी नडावे किती अन् नडावे कुठे?
माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
... बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वर्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना ...
सई ये..... रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परी, कैसे गुंफू गीत हे ...............
धुंद होते शब्द सारे .........................
मेघ दाटुनी, गंध लहरुनी बरसला मल्हार हा
मेघ दाटुनी, गंध लहरुनी बरसला मल्हार हा
चाँद राती भाव गुंफुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे .......
जीवनाचा गंध हा विश्रांत हा..... शांत हा
धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे.....
सई ये..... ...... रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परी, कैसे गुंफू गीत हे ...............
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना ... वर्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना ...
धुंद होते शब्द सारे..............................

Thursday, January 12, 2012

ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....

आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

मी म्हणालो,..... अगं वेडे... 
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)
तुझ्याविषयीच्या मोहाचं झाड
किती उंच उंच वाढतं आहे
बघ माझ्या मनात
एक अनोळखी जंगल सरसरत
उगवलंय माझ्या अंगभर

आभाळभर लख्ख चांदणं
पानातून घुमणारा वा-याचा आवाज
गच्च सावल्यांनी भरुन गेलेली जमीन
या सगळ्यांतून
दबक्या सावध पावलांनी
फिरतंय तुझ्या मौनाचं जनावर
कुठल्या पाणवठ्याच्या शोध घेतंय ते?
कशाची तहान आहे त्याला?

बघ
माझ्या शब्दांच्या बुंध्याला अंग घासून
सरकलंय ते इतक्यात पुढं
आणि मोहाची काही फुलं
टपटपलीत त्याच्या पाठीवर
उठलाय का शहारा?

आमोरासमोर अभे आहेत अखेर
माझा मोह आणि तुझं मौन
तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं
आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

'राधा' -एक अनाकलनीय गुढ


     राधा-कृष्णाच्या ‘अनामिक’ आणि हुरहूर लावणाऱ्या नात्याचं गुढ कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेलं आहे. या नात्याबाबत अनेक दंतकथा देखील सांगितल्या जातात. पण ते नातं पूर्णपणे कधी कुणाला उलगडल्याचं आजवर तरी ऐकिवात नाही. मनात असंख्य विचारांचं काहूर उठविणाऱ्या या नात्याचे पदर उलगडणारा एक लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला होता. आज सहजच जुनी कागदपत्र चाळताना तो पुन्हा गवसला. लेख वाचला अन ‘व. पुं.’च्या त्या वाक्याची पुन्हा आठवण आली. ‘जिवंतपणी मरण अनुभावायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ‘स्व’ उरत नाही.' राधेने श्रीकृष्णावर असच प्रेम केलं असेल का.? 'राधा-कृष्णा'च्या या अनोख्या प्रेमाबद्दल कुणाला आणखी काही ठाऊक असेल किंवा वाचनात आले असेल तर नक्की 'शेअर' करा.

     
     मला सापडलेल्या या लेखाचे मुळ लेखक कोण ते आता आठवत नाही. मात्र वाचकांसाठी हा लेख इथे ‘कॉपी-पेस्ट’ केला आहे. जसाच्या तसा..

     श्रीकृष्णाचा विचार राधेवाचून करता येत नाही. आणि राधेचाही विचार श्रीकृष्णावाचून करता येत नाही. राधा म्हटली कि श्रीकृष्ण आलाच आणि श्रीकृष्ण म्हटला कि राधा आलीच. भारतीयांच्या मनामनात राधा श्रीकृष्णासमवेत मोठ्या मानाने वावरते आहे. त्याच्या सोबतीने विहार करण्याचे भाग्य तिला लाभलेले आहे. कृष्णासमवेत ती सावलीसारखी उभी आहे. ती खरी भाग्यशाली आहे. कारण ते भाग्य रुक्मिणीला नाही. त्याची धर्मपत्नी असूनसुद्धा.
     ‘राधा श्रीकृष्णाची कोण’ हा प्रश्न आतापर्यंत अनेक विचारवंतांना पडलेला आहे. तिच कृष्णाशी नातं कोणतं ? माता ? प्रेयसी ? भगिनी ? भार्या ? कि सखी ? तिच नाव कृष्णाशी जोडले गेले आहे ते कृष्णावरील अनन्य अशा भक्तीभावामुळे. म्हणूनच ‘राधा-कृष्णा'ची जोडी अजोड आहे. ‘राधा-कृष्ण’ एकच आहेत, राधा हे कृष्णाचच स्रीरूप आहे व कृष्णच राधेचं पुरुषरूप आहे’, अशा आख्यायिका ऐकायला मिळतात.
     राधा-कृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला. पण काहीतरी सतत धमधमते-फुलते मागे ठेऊन गेला. भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत, राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, चांदण्यांनी पूर्ण भरलेले, रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्व आकाशाएवढे विस्तारले. रात्रीप्रमाणे ते अतीव मृदू व गुढ झाले. राधा-कृष्णाच्या प्रीतीमुळे भारतीय प्रीतीकथेला नवा कोवळेपणा आला. संसारी भाराने कधीही शिळा न होणारा भाव तिला मिळाला. प्रीतीच्या परिपुर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच या आदर्श प्रेमिकेने जणू श्रीकृष्णाच्या विरहाने स्वतःला बांधून घेतले. या राधेला कृष्णावाचून काही सुचतच नाही. मोरमुकुटधारी, दीड पायावर उभा राहणारा ‘वेणुधर’ म्हणजे तिचं सर्वस्व. त्याच्या ध्यासात, त्याच्या श्वासात झोकून देण एवढच तिला ठाऊक. ज्याच्यात आपण गुंतत आहोत, त्याच्याशी आपलं काय नातं असा प्रश्न कधी तिला पडला नाही. नव्हे, तिच्या दृष्टीने तो गौण होता. राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती. तथापि वयाचा हा अडसर त्यांच्या प्रीतीच्या आड कधीच आला नाही. लोकापवादाची पर्वा तिने कधीच केली नाही. कृष्णाशी एकरूप होण, त्याच्यात आपलं अस्तित्व विरघळून टाकण, एवढच तिला ठाऊक. तेच तिच्या जीवनाचं उद्दिष्ट होत.
     राधेला 'रासेश्वरी' अस म्हटलं जात ते खरच आहे. राधेसारख कुणी नाचलं नाही. 'तिच्यासारखा नाच अद्याप कुणाला जमला नाही', अस म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कृष्ण ‘खेळिया’ खरा पण खेळता-खेळता तोच तिच्या हातचं खेळणे बनला आणि पुढे तर तिच्या चरणाचा दास झाला. ‘तुझ्यावाचून तरीही अर्धा’ अशी स्पष्ट कबुलीच दिली त्याने तिला. म्हणूनच ‘बिन राधा, कृष्ण आधा’ अस म्हणतात.
    राधा म्हणजे अविरत प्रेमाची धारा. प्रीतीच्या या धारेत विषयवासनेला थारा नाही. या धारेला रोखण कुणालाही शक्य झालं नाही. पुढे वाहते ती धारा आणि विषयवासनेकडून उलट फिरते ती राधा. तथापि राधा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होऊन बसलं. परंपरेने कृष्णाला द्रौपदीशी जखडून टाकलं आणि व्यावहारिक नीतीची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पुराणात राधा आली आणि तिने हे सारे बांध फोडले. वय, विवाहबंधन काही काहीच त्यांच्या प्रीतीला अडवू शकले नाही. अति मृदू आणि अति दृढ अस ते 'सखा-सखी'चं नातं होतं. हे नातं हीच प्रेमाची अंतिम आणि असीम अवस्था होतं. उभयंताच्या प्रेमात आडकाठी निर्माण करणारी अनेक कारणे होती. कृष्णेशी संबंध आला तेंव्हा कृष्णाची वृत्ती अनावर झालेली नव्हती. तिच्याशी असलेले त्याचे नाते त्याच्या दृष्टीने सहज आणि अंतिम स्वरूपाचे होते. त्याच्यापुढे त्याला जायचेच नव्हते. राधा कृष्णाची कथा ‘रोमिओ-ज्युलियट’, ‘लैला-मजनू’ यांच्या प्रीतीकथेहून सर्वस्वी वेगळी आहे. समाजाचा विरोध होऊन वा कालांतराने मावळून एकतर त्याचं मिलन झालेलं आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. राधा-कृष्णाच्या प्रीतीत अस काहीच घडण असंभवनीय होत. कारण राधेचं आधीच लग्न झालेलं होत. रायाण-गोपाशी-अनयाशी. त्यामुळे कृष्णाशी आपण विवाहबध्द होऊ शकणार नाही, याची तिला मनोमन कल्पना असावी. कृष्णाशी विवाह करण्यास समाजाने विरोध केला असता तरी तिने तो मानला नसता. परंतु तिचे कृष्णाबरोबरचे संबंध हे ‘सखा-सखी’ पातळीवरचे होते. आणि तिला देखील त्यापुढे जायचे नव्हते. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला नाही. आणि राधेने आत्महत्या तरी का करावी ? कृष्णाशी विवाहबध्द होता येत नाही, याबद्दल तिला अतीव दुखः झालं असेल. पण तिने ते अनावर होऊ दिले नाही. अपेक्षाभंगाचं दुख: पचवायला फार मोठ मनोबल लागतं. अशा मनोबलाच्या अभावी ज्यांना जीवन जगण कठीण वाटतं, तेच आत्महत्या करण्याची पळवाट शोधतात. आत्महत्या हे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीचं द्योतक आहे.
     कृष्ण मथुरेला गेल्यावर तो परत येण्याची शक्यता नाही, याची तिला पूर्ण कल्पना होती. तरी तो परत येईल, या आशेवर ती त्याची प्रतीक्षा करीत राहिली. पण अश्रू ढाळीत बसली नाही. त्याच्या स्मृतीत जेवढ म्हणून मग्न राहता येईल तेवढ मग्न राहिली. एखाद्याच्या आठवणीत आत्ममग्न असण, हा निरंतर चालणारा प्रवास असतो. त्यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. त्यात दुरावलेपनाची भावना असली तरी ती सुसह्य असते.
तू उभी तिथे असे मुक जरी
तुझे नयन बोलती काहीतरी
आहे खोल खोल अन घारे
चमचम चमकती तारे
भूल घालती मज जादूगरी
तुझे नयन बोलती काहीतरी
डोळ्यातले जहरी भाव
मज करीती खोल घाव
वेडावते छटा मज लाजरी
तुझे नयन बोलती काहीतरी
कसे नजरेत बाण पेरीले
मज दाही दिशा घेरीले
किती जखमा झाल्या भरजरी
तुझे नयन बोलती काहीतरी
नजरेत तुझ्या धार किती
सांग केले तू ठार किती
मज वार लागला जिव्हारी उरी
तुझे नयन बोलती काहीतरी
असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....

Wednesday, January 11, 2012

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर
नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते

तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार,
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला,
दुःखं कधीच उमगत नाही

तिच्या क्षणभर दुराव्यानेही,
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!
तुझ्या ओंजळीतल चांदणं
कधी पाहीलयसं का निरखुन
प्रत्येक तारा देतोय साद
त्या जडवलेल्या कोंदणीतुन निखळुन


तुझ्या डोळ्यांतील गही-या डोहांत
कधी पाहीलेयस का तु डुंबुन
कशी जादु करतात ते नकळत
ते पाहीलेस का तु कधी अनुभवुन

तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडुन कडाकडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तिळ लावतात
आठवण हि कधी ढगान सारखी असते 
कधी धुक्यात दडलेली ,
कधी असते ती शांत वाऱ्या सारखी
जी हळुवार गारवा देणारी ,
कधी असते ती वादळा सारखी
जी कधी आली आणी कधी गेली ते न समजणारी, 
तर कधी असते उना सारखी मधेच सावलीत लपणारी
आणी
कधी असते ती पावसा सारखी जी
डोळ्यांना चिंब पाने भीजऊन टाकणारी ....
मनातल्या मनात मी
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी

लपेट उन्ह कोवळे,

असेच चिंब केस तू

उन्हात सोड मोकळे;

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी

लवून वेच तू फुले,

असेच सांग लाजुनी

कळ्यांस गूज आपुले;

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या

कुंवार कर्दळीपरी,

गडे विचार जाणत्या

जुईस एकदा तरी;

'दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता

उदास एकटेपणा,

तुझीच रूपपल्लवी

जिथे तिथे करी खुणा;

पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! 
आज पहाटे माझ्या मनाचा कोपरा न कोपरा ओलाचिम्ब झाला...चौकशी केल्यावर समजले, तुझ्या आठवणींचा पाउस ओला पडला....

एरवी तुझ्या आठवणी येतात अणि डोळे ओले करतात जाता ...मात्र आजचा आठवणींचा पाउस मात्र वलवाचा होता ...

तुझी प्रत्येक आठवण मनाला धुंद करते ...मनातील बाकि सर्व विचारांच्या वाटा पूर्णपणे बंद करते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी चाफ्याचे एक फूल असते ...कितीही वास घेतला तरी ते कायमच अगदी फ्रेश दिसते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी भावनेचा महापुर...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे गवयाला बरेच दिवसानी गवसलेला सुर...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे वर्षानुवर्षे पुस्तकात ठेवेलेले पिंपलाचे पान ...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे तू माझ्या पदरात टाकलेले आयुष्याचे दान ...

असाच आठवणी देवून मला श्रीमंत कर कुबेरापेक्षा ....
तू माझे आयुष्य कृतार्थ कर ...एवढीच देवाकडे अपेक्षा ....
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....

तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध माझ्या नाकात जावून बसतो .....

तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत नसते .....

तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू माझ्या मनात खोल रुजत जातेस ...

तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...

Tuesday, January 10, 2012

ओढ़ लागली कशी ही, सख्या साजना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ????

हुरहुर ही मनी दाटे
जवळी तु नसे
दर्पणात पहाताना
तूच तु दिसे

समजाऊ मी उमजाऊ मी, कशी या मना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ???

पाहताना तुज समोरी
पापणी झुके
भाव येती ओठांवर
होउनी मुके

जागती कशा हळव्या, गोड वेदना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना???

स्पर्श होता ओझरता
होई बावरी
रोम रोम जाई फुलुनी
जाई च्या परी

तु असावा मज समीप हीच कामना
नकळत जे घडले अलगद हेच प्रेम ना???
एक कविता शब्दांची
कागदावर उतरलेली
दुसरी प्रत्यक्षातली
मनामध्ये ठसलेली

एक आहे साहित्यातला
सुंदर आविष्कार
दुसरीचे हास्य जणू
धबधब्यातला तुषार

एक आहे साहित्यातली
अनादी आणि अनंत
दुसरीला मिळेना
आयुष्यातून उसंत

एकीसाठी झटत आहेत
विश्वातले साहित्यिक
दुसरीसाठी मरत आहेत
माझ्या सारखे आशिक

कविता आणि कविता
दोन्ही लाख मोलाच्या
माझ्या आयुष्यात
दोघीही महत्वाच्या
प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता.....

प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ..........

प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती...............

प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या.........

प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे.......

प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण...........

प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही..........
मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना
निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....
पाखरू वेडे मन असे,
शोधीत फिरे तुलाच राणी ....
कधी आर्त साद घाली,
कधी तुझीच गाई गाणी ....

शांत शांत सूर हे नवे,
तुझेच ऐकू येती राणी ....
कधी सुरांची मैफल सजे,
कधी गुणगुण तुझीच कानी ...

दूर दूर नभ एक वेडा,
रूप दाखवी तुझेच राणी ....
कधी होई चित्रकार तो,
कधी मनास कुंचला मानी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....

चांदो आणि मी!


मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
चांदो हसला,
चांदणीला म्हणाला,
'तू हो पुढे, मी आलोच जरा'
मला घेऊन मग चंद्र
मागल्या दरी आला
पायऱ्यांवर विसावत
हळूच मला म्हणाला..
'पोरखेळ नाही गं!
तुला चिडवत होतो जरा..'
'चांदो, का रे असं नेमका
माझ्या वर्मावर बोट ठेवतोस?
रोज रोज आकाशातून
मलाच का असा छळतोस?
मुकी माझी प्रीत आता
मनामध्ये मावत नाही
रात्रीशी बोलावं म्हटलं,
तर तुलाही माझ्याविना करमत नाही!
जा तुझ्या चांदणीकडे..
बिलगून बस तिला..
रोजच्या सारखंच आभाळातून
वेडावून दाखव मला!'
चांदो म्हणाला..
किती चिडतेस राणी?
तुझ्या त्या वेड्याची
आज सांगणारे तुला कहाणी..
तो ही अस्साच..
तुझ्यासारखा..खुळ्यागत वागतो,
ढगांवर तुझंच नाव लिहितो
'असं कसं नाव पुसलं?'
म्हणून वाऱ्याशी भांडतो!
तू इथे, अन तो तिथे
एकट्यानंच झुरताय!
तुम्हा दोघानाही खरं
थोडं एकांत हवाय!
तेवढ्यात समोर
पावलं काही वाजली..
'त्याला' घेऊन चांदणी
माझ्या अंगणी आलेली!
'thank you चांदो!
तुला रे कसं माझ्या मनातला
अचूक कळल?'
हसला गालात अन म्हणाला,
'अस्साच नाही चांदणीशी माझा टाका भिडला!'
हात माझा चंद्रानं हळूच
त्याच्या हाती गुंफला,
चांदणीला कवेत घेऊन,
तो ही मग ढगांत दडला!

Monday, January 9, 2012

भावना तुझ्या
तुझ्यातला तो भाव
भावतो रे मला
असा कसा रे तू
असाच असतो का रे
तू सांगशील का मला…
येता येता
तुझ्या आठवणीत
माझ्याही डोळ्यात
आले होते भरून
ह्या नात्यांच्या गाठी…
अश्याच असतात का रे…
खरय तुझ,
नाती असतातच अशी
जवळ असूनही भेटत नाही
तू दूर असलास तरी
तुझ्यी आठवण आज
आल्याविना राह्त नाही
पुन्हा तुझ्या ओवी
ओले करतात माझे डोळे
वाचूनी तुझी कविता….माझ्यासाठी…
म्हणूनच रे..
लिहीले हे नाते आज
फक्त तुझ्यासाठी
थंडीत घालवलेले ते गरम दिवस
उन्हामध्ये आडोशातले ते दिवस
भर पावसात भिजलेले ते दिवस
चांदण्या रात्रीत घालवलेले ते दिवस
आज आत्ता ते दिवस मज आठवतात… म्हणूनच लागली ओढ त्या क्षणाची आज
प्रत्येक क्षणात आठवणी अनेक
आठवणींत रुतलेले स्पर्श अनेक
नाते दोघांचे एकसारखेच असते
म्हणूनच ते असतात अविस्मरणीय
आठवतात मला ते क्षण आठवतात ते स्पर्श… ओढ लागली आहे मला त्या क्षणांची आज
रुततात प्रत्येक क्षणांत अनेक संबंध
त्या संबंधात रुततात अनेक मर्मबंध
जगावे ते क्षण आज अनेकदा जणू
कधी न जावेत क्षण ह्या आयुष्यातून पुन्हा…
बनून जावेत हे क्षण ह्या आयुष्यातील रंग व रंगवावे मी मज आयुष्याचे चित्र
रंगून जावे ह्या प्रेमरंगात
क्षणात जावे हरवून त्या प्रेमाच्या
झालो आहे मी क्षणभंगूर त्या एका क्षणासाठी
पुन्हा जगावेत ते सोनेरी क्षण स्मरावेत ते सोनेरी क्षण
आज वेध आहे मज त्या दिवसाचा…. म्हणूनच मज लागली आहे ओढ त्या क्षणांची आज
तुझं  माझं नातं

मोगर्याची वेल जणू ,

मंद  मंद दरवळलेलं

पापण्यांच्या  ओंजळीत

नाजूक  डोळ्यांना ,

अलगद  जपलेलं ,

                      सळसळत्या उनात

                      हिरवे रान जणू ,

                      घटका भर विश्रांती

                      अन डोळे मिटलेलं,

श्रावणातला इंद्रधनू

मी आभाळ रेखाटलेलं,

झिम्माड पाऊसात चिंब होऊन

गच्च भिजलेलं,

                  तुझ्या गालावरला थेंब जणू

                   तू अस्पष्ट पुसंलेलं

                  मी टिपलं स्वर्ण मोती

                   तू भान हरलेलं

तुटत्या तार्याचं  स्वप्न जणू

मज नित्य दिस लेलं

आठवून तुला चांदराती

शांत शांत निजलेलं
तुझ्या स्मरणांचे धुके
सतत वारा होऊन
सोबत करते

 " तुझीच मी , माझाच तू "
म्हणत म्हणत
काही नवी काही जुनी 
गोड गाणी गुणगुणते

कधी कधी
शब्दात माझ्या ताल शोधते
अन् कधी ...
मौनातले राग शोधते

फिरते ...
भिरभिरते ...
मुरते ... तसे ...
समोर येता ...
तूच कधी
... विरते !

तुझ्या स्मरणांचे धुके
वेड हे मन सतत
सैरवैर भिरभिरणार
विचारते मला
आहे का कोण तुला वेड लावणार

सतत तुझ्याच आठवणीत
गुंतून राहणार....
प्रत्येक गोष्टीत तुला
सामील करून घेणार .....
आहे का कोण तुला वेड लावणार ??

सहवास तुझा मिळावा म्हणून
रोज नवीन बहाणा करणार ....
कधी चुकून नाही म्हंटले
तर रुसवा धरून भांडण करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार???

सुख आसो व दुखः
तुला कधी न विसरणार ....
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
तुझा हात हातात धरून चालणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

नवनवीन स्वप्ने फक्त
तुझ्यासाठी रंगवणार ....
त्यात तू सामील व्हाव
आशी माफक अपेक्षा धरणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

खूप दिवसांनी भेटताना
तुझी आतुरतेने वाट पाहणार ....
क्षणाचाही विलंब न करता
तुला मिठीत घेणार.....
आहे का कोण तुला वेड लावणार ??

उगाच ह्या न त्या कारणाने
तुझ्यावर रुसून बसणार ....
डोळ्यातून तुझ्या पाणी येता....
तुझीच प्रेमळ समजूत काढणार...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

मायेची प्रेमाची उब जवळ आसताना
त्याच्या सहवासाचा गारवा देणार ....
जन्मदात्यांचीही आठवण न होवो
इतक निस्सीम प्रेम करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार



Friday, January 6, 2012

हवीस तू



स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

आठवण


आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची

त्या दिवसांनी


त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही जगू शकत
त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही मरू शकत
त्या दिवसांनी जाणलयं
तुझा आधार काय आहे
त्या दिवसांनी पाहिलयं
तुझ्यासाठी वेड कोण आहे
त्या दिवसांनी अनुभवलयं
वाट पाहणं काय असतं
त्या दिवसांनी दाखवलयं
कुठल्या जगात वावरायचं असतं
त्या दिवसांनी ओळखलयं
तुझ्यावर किती प्रेम आहे
त्या दिवसांनी सांगितलयं
आम्ही सरू तुमचा विरह संपवण्यासाठी

तुलाच शोधतोय!


अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुझांच????

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............


जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटतेजेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते
कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

माझे स्वप्नं माला हसतात.


माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,
मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.
थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.
माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.
मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,
आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.
बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.
मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.
त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.
अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,
मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.
वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

Thursday, January 5, 2012

अळवावरून पडताना थेंबसुद्धा त्या क्षणाला अनेक युगे जगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चौकटीच्या इवल्याशा फटीतून कवडसा अंधारातून झगमगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

नयनी अश्रू, ओठी हास्य, खेळ असा आननी रंगतो..
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चंद्र-चांदण्या दिसती जेव्हा पुनवेचा दिन उगवतो..
”त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..
ती बसली आहे माझ्या शेजारी
बोलतचं आहे ,बोलतचं आहे
निरर्थक ,अर्थपुर्ण
थोडं अंतर राखून !
हळूहळू डोळे पेंगायला लागलेत
तिचे अन् माझेही.
पण मी कसा झोपू?
या छोट्याश्या घडीतील एक क्षणही
मला तिच्यापासून दूर
व्हायचं नाहीये.

पण ती झोपलीच-
माझ्या छातीवर डोकं ठेवून.
राखून ठेवलेलं अंतर कधी
गळून पडलं
कळलंच नाही.
पण आत्तच या हृदयाला काय झालं?
किती जोरात धडधडतंय!
वेड्या हृदया,थांब ना जरासा!
ती उठेल नं तुझ्या आवाजानं,
अन् पुन्हा बडबडत राहील
थोडं अंतर राखून!
एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.

वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.

असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.

शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.

पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.

सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.

तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली

अधुराच नदीविनाही सागर.
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'
मी जेव्हा मनात डॊकावतो
आरश्यात मी " मला" बघतो
माझ्या रूपात मी "तिला" बघतो
’साथ-संगत" मी ओढुन आणतो .



मी जेव्हा मनात डॊकावतो,
तिला मी हळूच कवेत घेतो .
डॊळ्यात तीच्या मी मला बघतो ,
"गहिरा सागर" मी पीऊन घेतो .



मी जेव्हा मनात डोकावतो ,
मनासारख मी वागून घेतो .
माझ्या तालावर ्मी ताल धरतो ,
तालासुरात मी गाणी गाऊन घेतो .



मी जेव्हा मनात डॊकावतो
दारं सारि लावुन घेतो .
आत मी अन तीच राहातो
तिच्यासाठीच मी आत बघतो .
धुंद किनारी रेतीच्या खोप्यात
घरटे दोघांचे,नक्षीच्या रंगात
रंगात रंगुन मनातल्या मनात
हात घेऊनी तुझा हातात


क्षितीज भेटते लाल रंगात
लाली चढली तुझ्या गालात
मीच तुझा सये राजस
भरेल लाली तुझ्या भांगात

लहरी समुद्र लहरी वारा
उड्वतो बघ तुझ्या पदरा
चंद्रमा उतरला निळ्या पाण्यात
माझा चाँद माझ्या पुढ्यात


वारा वाहतो किती झोकात
उड्वी कुंतले तुझे नभात
खारया पाण्याचा खाराच स्पर्ष
तुला भेटता होतो गं हर्ष


फ़ेसाळल्या समुद्राच्या लहरी लाटा
तुला बोलावीत उंडारतात नभा
माझ्या मनाचा मोर पिसारा
तुलाच शोधती मनाच्या वाटा



क्षण प्रेमाचे
माझ्या भाग्याचे
निशीगंधी श्वासाचे
वाळ्वंटी झर्याचे
विखरुच नये कधी.........


ओंझळीत साठवुन
श्वासात घोळून
मनात कोरून
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


शब्दात बांधून
भावनेत गुंफुन
कवितेत कोरून
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


पानात फुलात
डोंगर दर्यात
आड्वाटेला
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


आकाशात ,ढगात
पावसाच्या थेंबात
कडाड्ल्या विजेत
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


क्षणांची बैठक
श्वासांशी खलबत
पावसाची बरसात
मनातली कविता
जशीच्या तशी
जपून ठेवलिय मी
कल्पी जोशी

Wednesday, January 4, 2012

भेट घ्यायची ओढ लागली
नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||
हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||
ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||
वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||
हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||
विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||
श्रम पुरले वेळही सरली
भेट घ्यायची ओढ लागली ||८||
कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.
नेहमीप्रमाणे पावसाळ्यात आज,
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझी आठवण आली...
आठवणींची जागा जणु इंद्रधनुष्यानेच घेतली.
प्रत्येक रंगात दिसणारी तू..
क्षणार्धात दिसेणासी झाली,
बिचार्‍या त्या इंद्रधनुष्याची जागा ...
काळ्या ढगंनी घेतली...
असं नाही की आठवण आता संपली

काळ्या ढगांकडे पाहताना आठवण मात्र तुझी होती...
काळ्या ढगांचेही हळु-हळु पाण्यात रुपांतर झाले,
सर दिसते डोळ्यासमोर, आठवण धार म्हणुन उभी राहिली...
हातात धरता धरता मातीत ती विलघुन गेली,
तीच माती आता पहात आहे!
निळ्या निभ्र आकाशात इंद्रधनुची वाट पहात आहे
प्रेमाच्या थेंबांनी व्यापलेली,
शिंपल्यांच्या माळेने श्रुंगारलेली,
सुर्याच्या प्रकाशात चमकणारी,
चंद्राच्या चांदणीत भुलवनारी,
शुभ्र पाण्याने वाहणारी,
नितळ मनाने गीत गाणारी.

बेधुंद होऊन ती वाहत असते,
वाऱ्याच्या ओघात ती नाचत असते
असतो तिचा एकच ध्यास,
सागराचा मिळावा तिला सहवास!
वाटेतील अडथळ्यांना येते ती पार  करून,
आणि जाते सागरात स्वतःला हरपुन!

नसते तिला तिच्या अस्तित्त्वाची  काळजी,
सागरात जीव असतो तिचा, अशी माझी ती प्रेयसी!
कधी आई होऊन मायेने जवळ घेतलेस मला
तुझ्या उबदार कुशीत आनंद दिलास सार्‍या जगातला

कधी शिक्षक होऊन सांगितलेस, "उतरू नकोस, चढ"...
पाठीवर विश्वासाची थाप मारलीस आणि म्हणालास, "लढ"

कधी माझा मित्र झालास, मैत्रीपुढे मला पार झुकवलंस
तुझ्या डोळ्यांनी मला जगाकडे पहायला शिकवलंस

आज कसं सांगू तुला माझ्या मनी भाव काय?
आज उमललेल्या या नात्याचे नाव काय?
ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.

"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही

"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही

"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.

“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही
यापूर्वी ओढ ही कुणाची वाटली नाही .
यापूर्वी आठवण कुणाची आली नाही.
पण का कुणास ठाऊक....
तुमच्याशी बोलल्या शिवाय आम्हाला कर्मत नाही.


यापूर्वी वर्षाचे थेंब जाणवले नाही..
वारा र्‍याचा गारवा जाणवला नाही
पण का कुणास ठाऊक...
तुम्हाला भेटल्या शिवाय जीवन तरनार नाही.


बंध रेश्माचे कधी तुटले नाही.
आत्मा शरीर हे कधी वेगळे नाही.
पण का कुणास ठाऊक...
दुसरी जरी भेटली तरी मन माज़ जुळणार नाही.

मनस्थती अशी ठीक नाही.
समोर भविष्य ही दिसत नाही.
पण का कुणास ठाऊक...
भीती ही तू म्हणशिल का "नाही".


बरेच दिवस ज़ाले कविता आम्ही केली नाही.
सुप्ता हे गुण कधी उजागर ज़ाले नाही.
पण का कुणास ठाऊक....
कविता ही वाचून आमच्य वर तुम्ही हसणार तर नाही.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी प्रेमाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
 
प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

प्रेम म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
 
प्रेम म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे
थोड सांगावा थोड लपवावा,
अस प्रेम असाव...........
थोड रुसवा थोड हसवा,
असा प्रेम असाव...........
गुपचूप फोन वर बोलवा कोणाची नजर पडताच
पटकन "अगं" चा "अरे"  आणि "आरे" च अ"अगं" करावा,
असे प्रेम कराव........
जग पुढे चालत असेल तरी आपण मात्र थोडा मागेच राहावा
टेलेफोन, समस आणि ए-मैल च्या जगात आपण मात्र पत्र लिहूनच बोलवा
असे प्रेम असाव..............
कुठे भेटायला बोलवावा पण आपण मात्र जाणून उशिरा जायचं
मग आपणच जाऊन  सोर्री म्हणावा,
असे प्रेम असावा ........
वर वर  तिच्या वागनाची खूप चेष्टा करावी,
पण तरीही  ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावा,
असे प्रेम असाव ...........
प्रेम हि एक सुंदर भावना हे झारूर जाणावा
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना हि समोर जावा
विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील
पण आपण मात्र खंबीर राहावा,
असे प्रेम असाव...............
अनेक संकट येऊनही भेटायला जाव,
असे प्रेम असाव.............
एकदाच होत, दोन मनच मिलन म्हणूनच जीवापाड जपावा
अस  प्रेम असाव..............................
अस प्रेम असाव  ............................... 

मला हवीये तुझी सोबत देशील का रे?
गुलाबी ह्या थंडीत हवाय तुझा उबदार स्पर्श
गरम हवेच्या झोतात हवाय छानसा गुलकंद
मिठीत तुझ्या मी विसरेन फाटलेले आभाळ
पडले कधी घसरून आयुष्यात तर हात माझा धरशील का रे?
वेळ असते चांगली वाईट दोन्हीत साथ मला देशील का रे?
नसेल मी जवळ तर खूप खूप miss मला करशील ना रे?
आनंद तर आपण देतोच सगळ्यांना दुख तुझे थोडे share करशील का रे?
प्रेम तर सगळेच करतात पण ते निभावशील का रे?
आहे मी तर फक्त तुझी ह्याची खात्री तू नेहमी ठेवशील का रे?
हवा आहेस तू आयुष्यभरासाठी.. फक्त माझाच तू होशील का रे?
एकच चहा, तो पण कटिंग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडून?

एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून.....
एकच श्रीखंडाची वडी, ति पण अर्धी तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासदुन....
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन....
अजुन काय हवे असते आईकडून?

एकच कथोर नकार स्वेराचाराला, तो पण ह्दयावर दगड थेउन.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगरया आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन.....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?

सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन.

Tuesday, January 3, 2012

तु हिमालयाचे बर्फाळ टोक...
कि धबधबयातील सप्तरंगी इंद्र्धनु...
तु कातिकेची श्रीमंत पुनव...
कि आशाडातिल ढ्गाची दाटी...
तु ओढ्यातील खळाळ पाणी...
कि हेमंतातील प्राजक्त्ती दव...
तु रेताड विस्तिर्ण माळरान...
कि निळे अफाट आकाश...
तु आशाडातील पहिला पाउस...
कि श्रावणातील खट्याळ रिप रिप...
तु चांद्णवेलीतिल निळी चंद्रकोर...
कि गुलाबावरील अबोल अश्रु...

राणी ! .....अग लाड्के.. तु अशी कशी ग... अशी कशी


तु ग्यानियाची अम्रतवाणी...
कि तुकयाचे अविट अभंग...
तु मिरेची अथांग विराणी...
कि कबिराच्या दोह्यातिल शहाणपण...
तु रामदासाचा ’उदासबोध’...
कि मोरोपंताची ’केकावली’...
तु बोरकरांची ’चांद्णवेल’...
कि कुसुमाग्रजांची ’हिमरेशा’...
तु केशवसुतांची ’तुतारी’...
कि बालकविचा वेडा ’औदुंबर’...
तु पाड्गावकरांची ’धारान्रुत्य’ छोरी...
कि भटाचा आपलाच ’एल्गार’...
तु आरती प्रभुचे ’नक्शत्राचे देणे’...
कि ग्रेसची ’सांजभयाची साजणी’


राणी ! .....अग बाई.. तु अशी कशी ग... अशी कशी

तु विश्णुच्या क्शिरसागरातील ब्रम्हकमळ...
कि येशुच्या चेहरयावरील ख्रिश्ती वेदना..
तु रणविराच्या तलवारीचे टोक...
कि स्वातंत्र्यविराच्या हौतात्म्यातिल त्याग...
तु कामगाराच्या माथावरील घाम...
कि समाजपुरुशांच्या मनावरील ताण
तु उपासमारीतील मातेच्या नयनातील अश्रु....
कि बोस्नियातील संघर्शाची ठिणगी
तु वसुंधरेचा ग्रिनहाउस इफेक्ट
कि अणुशस्त्र स्पर्धेतिल छुपे संधान

राणी ! .....कंब्खत.. तु अशी कशी ग... अशी कशी

तु प्रेयसिच्या गालावरची लाली
कि नयनातील ते विभ्रम
तु उर्जस्वल स्वप्नांची पहाट
कि वेदनेची सायंकातरवेळ
तु भावनांचा उस्फुर्त आविश्कार
कि शब्दाचा केवळ अवडंबर
तु नवऊन्मेश विलासी प्रतिभा
कि त्याचाच सलिल अविश्कार
तु भावसत्याची पुर्ननिर्मिती
कि भाससत्याचे धारान्रुत्य
तु केवळ प्रतिमांची भाशा
कि प्रतिमांची शुभ्र चांदरात

राणी ! .....अग वेडे.. तु अशी कशी ग... अशी  कशी
तू येणार असताना मध्येच
पावसाचं येणं कळत नाही...
पण तुझ्या प्रेमाएवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही...!


तुझ्या प्रेमाने कपाळावरचं कुंकुदेखील हसतं!
खरच प्रिये, या बंधनात कीती सामर्थ्य असतं!
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा,
आपण कोणाचे तरी व्हावं...
त्याच्यासाठी जगत असताना,
त्याचच होऊन जावं...!


प्रेमाचा वर्षाव नुकताच होऊ लागलाय,
कधी न जाणवणारा सुगंध आता,
सभोवार दरवळु लागलय!!


पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे,
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे..!


रातराणी उमलावी तशी तु उमलतेस,
माझ्या मनांत मनापासुन दरवळतेस..
खरं सांगु का ग तुला ?
तु मला मनापासुन खुप खुप आवडतेस..!
मन हे माझे आठवणीन आठव न्या चे निमित्त्या साधित फिरते
न तुला बोलवे न ,न मला बोलवे
अंतरारतील गोड संवेदना ,त्रासवून सोडे दोन्ही कडे

का  कुणास  ठाऊक
मन  हे माझे  आठवणीनअ
आठवण्याचे  निमित्त्या  साधित  फिरते ......... .

त्या  चकोर  नयनचे 
सुख  अनुभूव्न्या ,
वेडे  पिसे  होते ..........
तिची  वाट  पाहता  पाहता ...........,
आज ,,,,
का   कुणास  ठाऊक ...
मन  हे  माझे 
आठवणीन  आठवण्याचे  निमित्त्या  साधते ..........

एक  मेकात   गुंतलेला   श्वास ,,,,
धीर  गंभीर  आभास ....
ह्रीद्यातील  कंपने  देऊन जातात तिचाच  भास .......
न उरलेल्या या जगात तू बनून आलीस नाव उम्मीद खास ,,
तरीच,,,
का  कुणास  ठाऊक ,
मन  हे  माझे ,,,,
आठवणी  न  आठवण्याचे  निमित्त्या
साधित  फिरते .........................

तुझ्या  त्या  गोड  आठवणी  ....
तो  सुखद  सहावास .......
त्यावर  तुझ्याच  आठवणीचा  अट्टहास ....
मनाला  बावरा  करणारा ............शब्द  काह्स !!!!!!!!!!

कसा  विसरू   तो  मोलचा  क्षण  ..........
जिथे  ...माझ्या  हातील  तुझा  कोमल  हाथ .....
मनातली  मनात .........होणारी  मिष्ट  वेदना . ...
अपोआप हवा हवा स वाटणारा तुझा सहवास..........!!!!!!!!

का  कुणास  ठाऊक ...
मन  हे  माझे 
 आठवणीन  आठवण्याचे  निमित्त्या  साधित फिरते ..........
तेच क्षण आपले असतात,,
त्या भावना अतूट असतात ,,,,,,
कुणी तरी आपलेसे  वाटतात...... 
 जिथे श्वास गुंतलेले  असतात ,,,,,,,,,

प्रेमावली ती अविस्मरणीय,,
 जिथे तू मी आणि भावना रंगतात ...
त्याच बहरलेल्या रानात,,,प्रेम पाखरे प्रणयतात
तेच क्षण आपले असतात जिथे तू,मी, नी  भावना रंगतात .........

एक संवाद चंद्र आणि चांदणीचा,,,,,,,,,,
मैलांच्या दुरीतील आपले पण जोपासण्याचा
चांदणी  विचारे  चंद्राला .........
भेट शील का कधी मज सजना .....
मज स्वार्थ साठी कसा मी यु  तुझ पाशी...
आहे विसंबून सारी धरती मज वरती

चांदणी  उदास न भेटणार  प्रियकरास ,
दिन रात  याच विचारात.....
एकेर तुटून एक रूप होईल ......
चंद्रात पण नाही भेटनर   चंद्रास 
 तिथेच लागतील अखेर श्वास .........
जिथे भेटतील चांदणी आणि चांद..

होतील एक समीक .....एक रूप नी एक साथ  ....
पण कधी,,,,,,,,, न जन्म सोबत,,,,, न मरणा नंतर 
तेच दोन क्षण....
तिथेच आणि तिथेच,,,, जिथे तू मी नी भावना रंगतात ..........
जिथे तू मी नी भावना रंगतात ,,,,,,,,,,
जिथे तू मी नी भावना रंगतात .............................
तुझ्या दिसण्यात सये,
दिसे मला तिची झाक,
भेटली जी रात्री मला,
येऊन माझ्या स्वपनात,

होती नाजूकच तीही,
जशी नाजूक तू सये,
जशी मिटावी पाकळी,
स्पर्श होता लाजाळूने.

म्हणे मला लाजून ती,
आले तुझ्या रे मनात,
सारे तुझ्या भवताली,
आहेत जागेच जगात,

कुणी पाहिलं मला इथे,
निरोप घेते मी त्या आत,
सख्या नको हट्ट धरू,
माझी बाई ची रे जात

मीही रुसलो मग जरा,
धरला खोटा खोटा राग,
म्हटलो जाऊ नकोस प्रिये,
बाकी पाहिजे ते माग

आता विचार मी केला,
कसे थांबवू प्रेयसीला,
बाहेर जाहली पहाट,
आता उजाडले पहा,

अन लाजलीस तू तेव्हा,
चढला गालांवर रक्तिमा,
तशीच दिसतेस आता ,
जशी दिसलीस तेव्हा

सखे देशील का मला
एक भेट प्रेमाची तू,
पुन्हा सोडून जाण्याची तू
प्रिये घाई नको करू

तुझ्या दिसण्यात सये
दिसे मला तिची झाक,
भेटली जी रात्री मला,
येऊन माझ्या स्वपनात,
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
आठवणींचा हिरवा पान,
थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,
कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

मी अस्वस्थ, तू गाफील,
माझ्या मनाची सतार, तुझी हुकमी मेहफिल,
त्यातच एक तार, झंकारते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते  तुझ्यासाठी....

आभाळातल्या चंद्रला लाटांची ओढ,
तुजवीण अपुरी मज कवितेची ओंळ,
मी कण कण संपताना.. पुन्हा घडते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते  तुझ्यासाठी....


विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
कधी सांजवेळी
पापणीला पूर येई
आठवणी ओल्या तुझ्या
दूर दूर नेई!

ओघळत्या थेंबांचे
नाजुकसे क्षण
एकेक थेंब
सारं सांगून जाई!

भिजलेल्या डोळ्यांनी
कातरवेळ टळून जाई
त्या वळणावर तुझी
रोज आठवण येई!

किनार्यावर वेचलेले
सुखद क्षण,
वेड मन माझं,
साठवून घेई!

तुझ्या माझ्या मैफिलीचा
एक नाद येई
पावले हळूच, तोच ठाव घेई

तुझ्या गोड मखमली 
स्वप्नांचा
प्रिये , मज रोज भास होई
रोज भास होई!!
गमती गमतीत.

एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!

तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
 जगणं म्हणजे अधांतरी झूला!

धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
 जगणं असावं रंगमंच खुला!

मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!

एक गंमत सांगू तुला? 
स्वत:तच बघ मला!

एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!

Monday, January 2, 2012

सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

मी पाहता नभी मेघही सरावे
मेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

यातनांनी मनीचे रान भरावे
आसवांनी उरीचे बंध तुटावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे
तो : सर्वे  काही  तुझ्यासाठी , पौर्णिमेचा  चंद्र , उगवता  सूर्य  जे  मागशील  ते   देईन 

किरणांची  रंगत , चांदण्यांची  संगत

करून  देईन 

तू  माझी  राणी  अल्लड  मनी

माझ्या  प्रीत्फुला

तुझ्या  अंगणीचा  सोनचाफा 

व्हायचं  मला ,

ती : मी  हि  तुजीच  रे  तुजवीण  अधुरी

कधी  आपली  भेट  जुळावी 

तुझ्या  मिठीची  ओढ  सजना

न  कुणा  हि  प्रीत  कळावी .

मज  तुजीच  आठवण

तू  येशील  कधी  रे

नको  वेळ   दवडू   आता

नको  उशीर  करू  रे

तो : जगतो  तुझ्याच  साठी

तुला  मिळवण्यासाठी 

शर्थ  करतो  दुनियेशी

तुझ्या  प्रेमासाठी
मन लागेना   लागेना लागेना माझे,
का सारखे धावते  तुझ्या   मागे.

हि प्रीत अवखळ, जरी कि   चंचळ,
तरीही निर्मळ   भासे,
येई ना जवळ , वाढवी   तळमळ,
आणि दुरुनीच   हासे.
हे कोणत्या जन्मीचे जुळलेले   धागे .
मन लागेना लागेना लागेना   माझे.

होतात भास, कि हा   प्रवास,
होतो तुझ्याच    संगे,
क्षणी ना स्थिरते,असे हे   फिरते,
तुझ्या रंगी   रंगे.
तुझ्याविना जगताना जीवन वाटते   ओझे.
मन लागेना लागेना लागेना   माझे.

होई ना   सहन, वाटते गहन,
तुझ्याविना जीवन,
माझे हे मीपण, तुलाच   अर्पण,
केले   कधीपासून.
हे इतके सोपे तरीही तुला कसे   ना समझे.
मन लागेना लागेना लागेना   माझे.

वाटे जरी तुला, मी हा असा   खुळा,
परी प्रीत ना हि   कच्ची,
करीन प्रेम अपार, जीवाच्या पार   ,
शपथ हि   पक्की.
तुझाच नुपूर कानात माझ्या   सर्वकाळ वाजे.
मन लागेना लागेना लागेना   माझे.
वास्तवतेतील स्वप्न

सगळ्यांच एक स्वप्न असते
जगावेगळघर असते
         फुलासंगे खेळून
         तारंगणात विहार करतो
         चंद्रच्या शीतलतेत स्व:तला रमवतो
         सगळ्यांच अस एक मन असते
पण, ...........वास्तावता फार वेगळी असते
फुला सारख नाजूक मन
एका क्षणात विव्हळते
चंद्रची शीतलताही त्याला नकोशी होते
         पण, सगळ्यांचाच अस होत नसते
         नशिबला वेगळच काही मान्य असते
         काठावर येनारी नावही सहज डूबते
         हीच खूप मोठी वास्तवता असते
जे मला हव होतो
तेच माझ कधी नव्हत
तूटणार्‍या तार्‍यालाही
मन सतत काही मांगत होत
           पण, ते काय देणार होत
           ते तर स्व:ताच तुटत होत
           हेच फ्क्त माझ वेड मन होत
जे स्वप्नाला वास्तवता समजत होत
पण, जेव्हा वास्तवता समोर आली
तेव्हा ती वास्तवताही एक
स्वप्न भासु लागली........................!

खुप वाटतं तुझ्याविषयी .................



वाटतं सुखानेही तुझाकडे धाव घेतांना
अचानक होणारा स्पर्श जाणावा
चुकून डोळयातून थेम्ब गळला
तर माझा मनातला घाव भरून यावा

वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर
सर्वत्र पसरली मखमल असावी
चुकून एखादा काटा कधी रुतला
तरी वेदना फुलाहून कोमल असावी

वाटतं देवानेही तुझ्यासाठी
नवस न बोलता पाववं
तू हाक मारन्या आधीच
स्व खुशिने तुझा कड़े धावाव

तस् खुप वाटतं तुझ्याविषयी
पण हा कागद आहे म्हणुन बरं आहे
अणि ऐकायच झाल तर तुला
अखंड आयुष्य अपुर आहे

मागतोए बस सुख तुझाकरता
तो तुला मझ्याशिवाय पण मिळावा
जर मझ्यामुळे होतोए त्रास तुला
तर प्राण माझा याच क्षणी जावा.........
मन माझ मानत नाही
तूला सोडावस वाटत नाही
का मला सोडून जातोस?
मनाला माझया प्रत्येक क्षणी छळतोस
प्रेम करायला शिकवून
मग असा विरहात का सोडून जातोस?
माझया मनाचे दु:ख फक्त मला समजते
डोळ्यात माझया फक्त, तूच असतेस
माझयातील सहनशक्ति असा नको पाहु
आठवणीत तूझया डोळे माझे होतात ओलेचिब
हसर्‍या चेहेर्‍या मागे
मन सतत रडते,
कुटे तरी ही सल बोचते
तूझयाविना मी काहीच नसते
तू कधी येनार हेच फक्त
या क्षीतिजाला विचारते
माझी व्यथा तर फक्त
कवितेतच असते.
तू आणि मी,अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ असावी

गुलमोहराचा बहर,आणि तिथेच आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,गोड ड्रीम डेट असावी

तू मात्र आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,इतकी तू सुंदर दिसावी

रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,प्रेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून जाताना,परतीची मात्र तमा नसावी

निरोप घेताना डोळ्यां मध्ये,अश्रुची एक झलक दिसावी
डोळ्यां मधले भाव जाणुनी,नाजुकशी ती मिठी असावी

जीव ओतला तुझिया पाई,आशा तुझीही हीच असावी
एकांताची साथ अशी हि, दरवेळी रम्य असावी.