NiKi

NiKi

Saturday, December 24, 2011

वैसे तो सभी रिश्ते-नातों का अपना विशेष महत्व है, सभी के अपने अलग कर्तव्य और अधिकार हैं। परमात्मा द्वारा किस परिवार में हमें जन्म दिया गया है उसी के अनुसार हमारे सभी रिश्ते-नाते निर्धारित होते हैं। जन्म से जुड़े रिश्तों के अतिरिक्त एक रिश्ता है प्रेम का। किसी से नि:स्वार्थ प्रेम का रिश्ता सदैव पूजनीय है यह संदेश दिया है श्रीकृष्ण ने। श्रीकृष्ण और राधा इस बात का उदाहरण है कि नि:स्वार्थ प्रेम हर रिश्ते से बढ़कर पवित्र और महान हैं। इसी वजह से श्रीकृष्ण की पूजा राधा के साथ ही की जाती है।

रिश्तों में माता-पिता और गुरु का स्थान ईश्वर के समान ही बताया गया है और यह लोग सदैव आदर और मान-सम्मान प्राप्त करने के अधिकारी भी हैं। इनका अनादर करने वाले से भगवान कभी प्रसन्न नहीं हो सकते। स्वयं भगवान विष्णु ने जब-जब अवतार लिया है उन्होंने माता-पिता और गुरुदेव के प्रति श्रद्धा और भक्ति रखने का ही संदेश दिया है। कोई भी व्यक्ति जन्म से मृत्यु तक असंख्य लोगों के संपर्क में आता है। कुछ विशेष लोगों से उसे स्नेह हो जाता है, कुछ मित्र बन जाते हैं। इन सभी लोगों में किसी खास शख्स के प्रति हमारा मन नि:स्वार्थ भाव से प्रेम करने लगता है। ऐसा ही प्रेम था राधा और श्रीकृष्ण के बीच। इनका प्रेम की कोई सीमा नहीं है, दोनों ही एक-दूसरे से असीम प्रेम रखते है। इनके प्रेम में कोई स्वार्थ नहीं कोई अपेक्षा नहीं है।

गोकुल में ऐसी कोई गोपी न थी जिसे श्रीकृष्ण से प्रेम न हो। हर गोपी का प्रेम पवित्र और भक्तिपूर्ण था। सभी श्रीकृष्ण को अपने प्रियतम के रूप में ही देखती थी और श्रीकृष्ण भी सभी को वैसा ही स्नेह प्रदान करते थे। इन सभी गोपियों में राधा का स्थान सर्वोच्च है। राधा का प्रेम इतना गहरा और महान है कि उन्होंने अपना सर्वस्व श्रीकृष्ण पर न्यौछावर कर दिया और अपने मन को पूरी तरह से श्रीकृष्ण के चरणों में लगा दिया। श्रीकृष्ण भी राधा के प्रेम में पूरी तरह से रंग गए।

श्रीकृष्ण और राधा के प्रेम की गहराई को दर्शाते कई प्रसंग हमारे धर्म ग्रंथों में दिए गए हैं। उन्हीं के अनुसार एक बार राधा से श्रीकृष्ण से पूछा- हे कृष्ण तुम प्रेम तो मुझसे करते हों परंतु तुमने विवाह मुझसे नहीं किया, ऐसा क्यों? मैं अच्छे से जानती हूं तुम साक्षात भगवान ही हो और तुम कुछ भी कर सकते हों, भाग्य का लिखा बदलने में तुम सक्षम हों, फिर भी तुमने रुकमणी से शादी की, मुझसे नहीं।

राधा की यह बात सुनकर श्रीकृष्ण ने उत्तर दिया- हे राधे, विवाह दो लोगों के बीच होता है। विवाह के लिए दो अलग-अलग व्यक्तियों की आवश्यकता होती है। तुम मुझे यह बताओं राधा और कृष्ण में दूसरा कौन है। हम तो एक ही हैं। फिर हमें विवाह की क्या आवश्यकता है। नि:स्वार्थ प्रेम, विवाह के बंधन से अधिक महान और पवित्र होता है। इसीलिए राधाकृष्ण नि:स्वार्थ प्रेम की प्रतिमूर्ति हैं और सदैव पूजनीय हैं।
तेव्हा पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...
कोण ग तो तुझा म्हटल्यावर
झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

रोज निरोप घेताना
पुन्हा कधी भेटशील म्हणताना
पाणावलेले डोळे आणि
कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

कारण नसताना तासभर फोनवर भांडायचा
स्वतः राग करून फोनही ठेवायचं
फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला
आय लव यु चा म्यासेग बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

नकळत स्पर्श झाल्यावर
तिच्या हृदयाचा  चुकणार ठोका
आणि थरथरणारे ओठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटत....

Thursday, December 22, 2011

रात्रंदिन ध्यास तुझा अंतरीच्या अंतरी
श्वास परी रुंधतसे होय मी बावरी
आज स्वस्थता जीवास लाभे तरी निश्चित
दावूनी गेला प्रभाती काक शकुन सांगत
हृदयीच्या दर्पणी पाहतसे नित तरी
दाटे का अंतरी एक गोड हुरहुरी
रे सख्या शुभघडी ये जवळी क्षणोक्षणी
सगुणरुप दाविसी कृपावंत होऊनी
होऊनी राधासखी भेटणार मी तुला
दिठीभरूनी निरखणार निराकार वत्सला
जन्म जन्म रे हरी तू जिथे मी तिथे
कधी मीरा कधी जनी तुझे रुप कृष्ण ते
नेत्र मिटूनी ध्यानमग्न राधा श्रीचिंतनी
भेटणार भक्तसखी हर्षे हरी मनोमनी....
रुक्मिणी होण्यापेक्षा
माझ्या कृष्णाची राधा होणच आवडेल मला
एक आयुष्य सोबत घालवण्यापेक्षा
युगांसाठी तुझी होणच आवडेल मला

राधे सारख आधी माझ नाव
हा ध्यास मुळीच नाही........
पण तुझ्या सोबतीने प्राणसख्या
सदैव रहायच आहे मला

तू फ़क्त माझा व्हावास
असा हट्टाहास नाही करणार मी
पण माझ्यात फ़क्त तूच असशील
इतकच अभय दे मला .....

जग काय म्हणेल
याची चिंता किंचितही नाही
पण तू मात्र अंतर देऊ नकोस
या तुझ्या वेड्या राधेला ......
का होतं मन असं हळवं
कोणाच्या तरी आठवणीने ?
एक एक क्षण का वाटे युगासमान,
त्याच्या दूर जाण्याने ?

भेटीनंतरही का .....
भेटण्याची आस असते ?
त्याच्याच गोड स्वप्नांमध्ये
का रात्र सारी हरवते ?

त्याने फक्त आपल्यालाच पहावं,
आपल्याशीच बोलावं.. असं काही वाटू लागतं
प्रत्येक छोटी गोष्ट ही
त्यालाच सांगावी म्हणून मन आतुरतं

कळलं का तुम्हाला, अचानक
असं वेड्यासारखं का होतं ?
दुसरं काही नाही .........
यालाच तर म्हणतात " प्रेमात पडणं "
निशिगंध पसरला
मुग्ध शरदाचे चांदणे
उतरता अवनीवर
हर्षे सौंदर्याचे लेणे

कशी किमया मग झाली
सोने हळूच पसरले
प्रियकराच्या उबेला
प्रिया मन आसुसले

नाही कसले बहाणे
नाही तसले उखाणे
लज्जा लाजत प्रियेची
कुशीमध्ये विसावणे

थंड वार्याची झुळूक
गात्र गात्र थरारती
तरी प्रिया का रुसली
मग प्रिया का हसली

काय करावे सुचेना
प्रियकर झाला खुळा
शारदाचा येता झोका
झाला आणिक बावळा

मानू आभार कुणाचे
शारदीय चांदण्याचे
थंडगार त्या हवेचे
उबदार कि प्रियेचे

राधा एकरूप झाली
कृष्ण सावळा दिसेना
शरदाच्या चांदण्यात
गौर वर्णही हरवला

पावा कुणासाठी होता
कण कण झंकारता
राधा मनी कृष्ण कृष्ण
कृष्ण मनी राधा राधा

Wednesday, December 21, 2011

काहीतरी राहतंय..
रोज झोपताना वाटतं
खूप बरसून जाईल एवढं आभाळ मनात दाटतं
तरी क्षण चालून जातात
मन चालत नाही
डोक्यामध्ये किड्यांशिवाय काहीच फिरत नाही
तेवढ्यात कुठून दोन ओळी सहज सुचून जातात
तेवढ्यात कुठून दोन ओळी सहज सुचून जातात
काही राहिलेल्या अंगणावरती सडा मारून जातात
शब्दांमागून सुरु होतो शब्दांचाच हा खेळ
मन शांत सुखावून जाईल अशी पुन्हा येते वेळ
चक्क डोळ्यांसमोर थकवा कूस पालटून जातो
झोपण्याआधी  पानांवरती कुठून गारवा येतो

तुझ्या नसण्यातही असण्याचा भास... हे काही नवीन नाही... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत तुला पाहणे अजूनही संपले नाही.

गार वाऱ्याची झुळूक आली
अंग अंग शहारून गेली
जाणवली त्यातही ओळखीची उब
ओळखीचा तो अलवार स्पर्श
माजले विचारांचे काहूर मनी
तुला भेटून तर नसेल ना आला हा वारा
फुंकर घालून हळूच
उडवले असतील तुझे केस
अन मग गालांसोबत
मस्ती करणाऱ्या त्यांना
दटावून बोटांनी दोन
सरकवले असेल कानामागे
पण तेही कुठे ऐकणारेत
एखादी बट येईलच पुन्हा गालावर
पाहून हे सारे
स्वतःशीच हसशील गालात
मग हा सारा खेळ मांडणारा वारा
पिसा होऊन भटकेल आपला रस्ता...
पुन्हा तशीच झुळूक आली
पण या वेळी मात्र
देहाबरोबर मनाही शहारून गेली
अशीच यावी वेळ एकदा ध्यानी मनी नसताना
असे घडावे अवचित काही
तुझ्या समीप मी असताना
अशाच एका संध्या काळी
एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चित्त पाखरू
केवळ तुझी नि माझी जवळीक
संकोचाचे रेशम पडदे
हा हा म्हणता वेहून जावे
समय सर्व मंद गतीने
आणि प्रीतीचे सूर जुळावे
मी मागावे तुझिया पाशी
असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तू हवे असताना
शब्द वाचून तुला कळावे
बूज मनी या लपलेले
मुक्त पाने तू उधळून द्यावे
जन्म भारी जे जपलेले
स्वप्नांशी बोलणारी तू….
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं,
अर्धवट झोपेतली तू
आणि तुला झुलवणार तुझं स्वप्न,
निरागसतेच्या एका नाजुके सारखं…..
कळत कस नाही तुला वेडे
स्वप्नांना प्रकाशाचा शाप असतो..
त्यांना
निळ्या आकाशाचा धाक असतो..
हात नको लावूस… ती विरघळुन जातात
कापराचे बोचरे क्षण… हातात येतात..!!!!
वा-याचा आकार आणि पा-याचं रूप
काय काय बघायचं ग….
तुझी नंतरची तडफ़ड नाही बघवत
हुरहुर लागते मनाला..
पण छान दिसतेस तेव्हाही,
वाहुन गेलेल्या वा-याला पकडताना…..
खरच,
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं….
ते बघायलाही नशीब लागतं नाही…?
मन मोकळं, अगदी मोकळं  करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं  आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण  आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर  पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं,  अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात  काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या  उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने  चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी  बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो  आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून  ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं  आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन  पाखराशी बोलायचं.
 
ती आवडते मला, मी हि तिला आवडे
हे बोलण्याची गरज आम्हाला कधीच ना पडे
तीझ्यासोबतच्या आठवणींचे मज हृदयात सडे
पण एक मर्यादा नेहमीच नडे

ती सोबत असताना वाटे समयही  स्तब्द व्हावा
तो एक क्षण कधीच पुढे न जावा
जगून घेतो आम्ही सर्व आयुष्य त्या क्षणात
कोणास ठाऊक काय घडणार आहे भविष्यात
 
तीझी सावली जाताच भासे उन्हाची झळ
ती म्हणजे... माझ्या आयुष्यातलं मृगजळ
काही नात्यांना नावांमध्ये नाहीच बांधता येत
काही नात्यांना नावांमध्ये खरच.... नाहीच बांधता येत

Monday, December 19, 2011

कल्प भास



सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास||धृ||

नयनास भार होते. निखिल कल्पनांचे.
तुज पाहता सख्या रे,जणू स्वप्न रूप  साचे.
मी मुरली रे कान्हाची,तू सुरांचा आभास||१||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

बहरात यौवनाच्या, मी धुंद फुल व्हावे.
गंधित या फुलाने, तू स्वैर-भैर व्हावे.
ही पाकळी मिटावी,तुझा फुलारून श्वास||२||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.
अक्षर म्हणतात शब्द हवा,
शब्द म्हणतात अर्थ हवा,
माणसाच्या आयुष्याला
यशाचा मात्र स्पर्श हवा.

एकेका फांदीवर बसते,
रोज नवी कोकिळा,
त्या फांदीची मनीषा हीच,
कि रोज तिला नवा पक्षी हवा.

लक्ष तारकांच्या देशी,
एकाच तयांना चंद्र हवा,
अन चंद्रची पहा आकांक्षा,
त्यास नवा आसमंत हवा.

सुरांची मेहफिल खूब साजेल,
त्या साथीला मात्र सितार हवा,
कित्येक जीव येथे आले नि संपले,
जगण्यास त्या आधार हवा.

शब्दांचे सहजच काव्य बनते,
रचणारा एकच कवी हवा,
कवी मनाला प्रेरित करण्या,
भाव प्रीतीचा मनी हवा.
 

Friday, December 16, 2011

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

"कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

हसता हसता डॊळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दॊनच जीव ... आणखी कुणी नसॆल
भिरभिरल्यागत होण्यासारखंल बिलकु काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारख वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचावासा वाटेल
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकु काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागॆल ही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डॊळे पुसत, पाणी प्यावे थॊडॆ
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडॆ
सांगुन ध्यावं काळजीसारखं बिलकु काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही

शब्द

शब्द हसणारे,शब्द हसविणारे
शब्द रडणारे,शब्द रडविणारे
कधी मधाळ,तर कधी रसाळ
वेगवेगळ्या तर्हेचे,वेगवेगळ्या स्वभावाचे
कधी सागराप्रमाणे उसळ्णारे
तर् कधी झरयाप्रमणे खळखळणारे

शब्द,कधी भांडतत,कधी कुजबुजतात
कधी रुसतात,कधी उमलतात
आणि कधीतरी फक्त डोळ्यातूनच कळतात

भावनेच्या पोटी जन्म घेउन
तिचे अस्तीत्व दाखवतात
आणि कधी कधी मात्र शब्दच
निशब्द होतात........
स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात
फुलांसारखी
फुलवायची असतात
घरांसारखी
सजवायची असतात
कारण स्वप्ने
आपलीच तर असतात
रेशीम बंधाने त्यांना
बाधायची असतात
मनातल्या मंदीरात
पुजायची असतात
कधी कधी
अश्रुंच्या पुरात
वाहुन द्यायची असतात
आठवणींच्या जगात कोठेतरी
साकारायची असतात
पुर्ण झाली नाहित तरी
शेवटी स्वप्ने ही
आपलीच असतात
ह्र्दयात त्यांना
जपायची असतात

आठवणी..

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......

काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....

काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......

जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....

किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात...

नेहमीच वाटतं मला

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दुध पाण्यासारखं हे
आपलं प्रेम एकजीव व्हावं


नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या ओठावरले ते ' अमृतकण '
माझ्या ओठांनी अलगद टिपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सहवासाने तुझ्या मग
माझ्यात बारा हत्तीचं बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माळलेल्या मोग-याने
मग बेधुंद दरवळाव..

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा
तुझ्या डोळ्यात सजवावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चुकलेल्या हुकलेल्या क्षणांना
पुन्हा एकवार जगावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
भारलेल्या या क्षणांना
मी निरंतर जपावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझं माझं गुपित तू
नजरेनं उलगडावं.

नेहमीच मला वाटतं
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रत्येक सुखाशी
तुझं नातं असावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
घड्याळाच्या काट्याने मग
त्याच क्षणावर थांबावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या जवळ असण्यानं
माझ्या प्रयत्नाना बळ यावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सोबतीने तुझ्या सखे
प्रेमाचं हे गौरीशंकर गाठावं

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दिव्यांच्या प्रकाशात
तुझं तेजोमय रूप बघावं

आठवणींचा सहवास

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास

Wednesday, December 14, 2011

न चुकता करावा तुला फोन
मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...
याक्षणी आठवतेस तू...

फोन हाती घेतल्यावर बघावा
तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा...
याक्षणी आठवतेस तू...

एखाद्या दिवशी पहावी वाट
करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तू...

तुझं नेहमीच खट्याळ बोलणं
माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं...
याक्षणी आठवतेस तू...

तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट
माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं...
याक्षणी आठवतेस तू...

मित्र म्हणून काय नाही केलस तू
माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तू...

नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं
माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तू...

डोळ्यातील अश्रूही थाबेना आज
रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तू...

आजही पुन्हा तशीच गेली,

आजही पुन्हा तशीच गेली,
रात्र अख्खी तळमळती....
आठवणींचा फ़ुलुन पिसारा,
गुदगुल्या पुन्हा अंगावरती.....

मी कुस बदलली बर्‍याचदा,
अन मिटले डोळे आवळुनी....
पण मुर्त तुझी निर्मळ मज,
उठवत होती का हालवुनी.....

उष्ण उष्ण हवा जरी होती,
रोम रोम तरी पुलकित होता....
शहारलेल्या मनास घेऊन,
बसलो होतो मी हसत स्वतः....

आठवण अशी तर तु कशी,
का मजला दुरुन दिसशी.....
नकोस येऊ जागत्या स्वप्नी,
नेत्रपटलांची ही जादु जशी....

तु फ़ुलराणी कि रातराणी,
घुमते कानात तुझी वाणी....
रात्र कशी तडफ़डते जणु,
चित्र तुझे गं मनीध्यानी....

बोल लाडले बोलते झाली,
दशा करुन ही हळहळती....
आजही पुन्हा तशीच गेली,
रात्र अख्खी तळमळती...

Tuesday, December 13, 2011



तुझी आठवण

तुझी आठवण
तुझ्याशी बोलून बर वाटत.
तुझ्या सहवासात खेळावस वाटत.
तुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत.
तुझ्याशी विनाकारण भांडावस   वास  वाटत.
तू रुसलीस का मुद्दाम तुला चीडवावस वाटत.
पण खरच तू दररोज आनंदी राहव अस मनाला वाटत.
नको जूस मला कधी सोडून
कारण तुला बगून अजून जगावस वाटत.....

तुझ्या विचारांत

पाऊल वाट जागीच असते
पावलेच उगाचच चालतात
दृष्टीच जरा मंदावली असेल
दोष मात्र धुक्यांना लावतात

नाजूक हळुवार पाऊल जरी
ठसे ओल्यामातीवरच उमटतात
हळव्या मनावरच म्हणून
ओरखडे जरा खोल दिसतात

मेघ घनदाट बरसतात जरी
अश्रूही आपला वसा उचलतात
पावसाच्या थेंब आड ते
आपले अस्तित्व लपवतात

त्याच विचारांचा मग
पुन्हा पुन्हा विचार होतो
अन त्याच थेंबांना घेऊन
पुन्हा तो पाऊस बरसतो

तुझा एक सहवास .............................................

तुझा  एक सहवास हवा हवासा वाटतो
सत्यात नसला तरी स्वप्नात मिळावासा वाटतो.

        वाटते का तुला कधी माझ्या स्वप्नात यावं
         गुपचूप येवून मिठ्ठीत मला घ्यावं.

तुझ्या त्या मिठ्ठीने मला जाग येवून जाईल
बंद पापण्याची उघडझाप सुरु होईल.

       हरवून जाईल मी स्वताला तुझ्या सुंदर डोळ्यात
       गुरफटलो आसेल आपण एकमेकांच्या श्वसात.

सहवास हा तुझा एक वेगळाच भासेल
प्रत्येक वेळी मला हवाहवासा वाटेल.

रात्र..

मन खूप दाटलंय
काहीतरी बरसणार
पाऊस पडण्याअगोदर
ढग जसे गरजणार

काहीतरी हरवतंय
नेमकं माहित नसणार
हातचं सारं सोडून
तेच शोधत बसणार

कुठूनतरी मधेच
तिची आठवण काढणार
हवेहवेशे क्षण जुने
सारे परत पळणार

गेला दिवस बरा
की रात्र थोडी जागणार
संपत आलेली गोडी
शेवटपर्यंत चाखणार

हे नेहमीचंच असणार
परतपरत घडणार
वेगळं करायच्या नादात
वेगळं काहीच नसणार

मधुर भेट................

कातर वेळ ही, मन हलवून जाई,
उनाड चंद्र ही, स्वछनद ढगाण  सोबत लपछुपी खेळतोय,
जणू तोही आज आपल्या पहिल्या मधुर भेटीस जळतो आहे,
कदाचित तो ही आज आपल्या चांदण्यानं आठवतोय आहे,
निशब्द तू ही, निशब्द मी ही,
निशब्द पणे फक्त एकटक बघावेत,
तुझ्या भिरभिरनर्या काळ्या बुभुळ्यानचा, पाठलाग माझ्या डोळ्यांनी करावा,
स्वछ, सतेज, टपोरे नेत्र तुझे ते,
तुझाच मनातील कल्लोळ मला सांगून जावा,
शांत वारा तुला काही सांगतोय खरा,
पण माझ्याच मनातील भाव तुला कळून सुधा नं कळावा,
मिठीत माझ्या फक्त तूच असावीस,
उष्ण स्वाश तुझा, रोमांचित शहारे जागवून जावे,
नखशिकांत भिजून प्रेमाने शांत चित्त मान व्हावावे,
निशब्द असूनही नेत्र मात्र बोलावेत,
मानाने मानस साध घालावी,
जशी स्वप्न लोकी प्रीतीस प्रीत भेटावी,
मग मात्र तू जडावल्या पावलांनी निघून जावीस,
पाऊलखुणा मात्र माझा मनात उमटवीत जावीस,
मी मात्र तुझ्या असेच तुझा आठवणी सांबाळंत जगावे,
परत आपल्या मधुर भेटीची वाट  बघात जगावे.

एक असंही प्रेम होतं........................

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......

मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा   फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो   सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

दुसऱ्या   दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि   ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये   बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे .

थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय
ती   मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण,   रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ   होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि   त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते .... 

माझं स्वप्न आहे, ..............................

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन, एकाच दिशेन चालण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन, एकदा मिठीत घेण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत राहण्याचं,
छोठसं घरट बांधून, त्यात दोघांनीच राहण्याचं,

माझं स्वप्न आहे, तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून, ती पूर्ण करण्याचं,

माझं स्वप्न आहे, मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून, ते तू रंगवण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुझ्यावर रुसण्याचं,
रुसलो मी म्हणून तू प्रेमाने म्हणवण्याचं,

माझं स्वप्न आहे, हसन्याचं हसवण्याचं,
एकचं हे जीवन एकून स्वर्गमय करण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
तुझ्यासोबत जगुन, तुझ्या अगोदर मरण्याचं,

पण मनात भीतीसुद्धा आहे, हे स्वप्न तूटण्याचं,
माझं स्वप्न विखरुन सर्वच होत्याचं नव्हतं होण्याचं.

Saturday, December 10, 2011

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

कधी ना विसरणारी  तीकधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती
अनंत  आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची 
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

न संपणारी रात्र ती
न संपणारा दिवस
मी आणि गर्द आसवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

स्वप्नातली राजकुमारी ती
स्वप्नातला राजकुमार मी
आणि खरया अस्तीत्वाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

जीवनाची राणी ती
मृत्यूचा राजा मी
आणि झुरणाऱ्या जीवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अर्धवट प्रेमिका ती
अर्धवट प्रेमी मी
आणि अर्धवट प्रेम कहाणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

दूर कुठेतरीची सुरवात ती
जवळचा अंत मी
आणि दोघांच्या मिलनाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

तू बोलावे आणि मी ऐकत राहावे

तू बोलावे आणि मी ऐकत राहावे
थरथरणा-या ओठातून शब्द काहीच न निघावे.

थरथर तुझ्या ओठांची उघड बंद खेळ पापण्यांचा
हळूच सावरशील पदर उडणारा तुझ्या साडीचा.

आतुरलेले मन माझे शब्द ऐकण्यासाठी तुझे
ऐकताच शब्द भान विसरून जाई माझे.

थरथरणा-या ओठातून हळुवार शब्द निघू लागतात
नकळत माझ्या हृदयाला स्पर्श करून जातात.

खरच शब्दामध्ये प्रेम सामवले आसते का
वेड न होणारे मन सुद्धा मग वेड होवून जाते का.

नाते तुझे माझे

भेट मनाची या मनाला
श्वास श्वासास मिळाला
स्पंदनांचे गीत व्हावे
दवाने  दवास भिजवावे 


राहिले ते ऋण होते
मिटले  ते समर्पण
अस्मितेच्या स्वत्वाचे
जसे दर्शनार्थी  दर्पण


सावलीही साथ सोडे
अन ते हि तीमिरांती
मात्र समांतर असे  तू
या जन्मी  अन मरणांती


मायेच्या नात्यात
गुरफटलेली सर्व नाती
ना--ते असे हे नाते
उलगडुनी साऱ्या गाठी.

प्रेम म्हणजे.............................

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ जरा जास्त तुझा कधी कमीच असत|
कधी राग तर कधी गालावरच मिश्खिल हास्य असत,
कधी भांडण तर कधी frustration असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत..

आज सुखद चंद्राची शीतल छाया असत,
तर कधी पाण्याविणा तापलेली धरणी असत |
कधी हळूवार झूलणारा झोका तर,
कधी राजधानी एक्सप्रेस च्या ट्रॅक वरचा engine असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत ...

आज प्रेमाच्या आणा भाका घालता श्वास कमी पडतो,
तर उद्या रुस्व्या फुगव्याला कारण नसत|
आज काहीही केलेला अमृतमय वाटत,
तर उद्या साधा बोलन पण विशपरी दुखद असत|
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ कधी जास्त पण तुझा ही तेवढच जिवापाड असत|
 

Wednesday, December 7, 2011

खुप दिवसांनी विचारले तिला...............................

खुप दिवसांनी विचारले तिला
एक जागा सांग जिथे या जन्मी जायचे तुला

काही वेळ विचार करून म्हणाली ती
आहे अशी एक जागा
जायचेय माला तिथे कधीतरी

आकाशात, सागरात
दर्याखोर्यात की आसमंतात
विचारले मी तिला

भावनांच्या वार्यावर उडायचे आहे
अनंताच्या सागरात डूम्बयाचे आहे
फ़क्त एकदा स्वतहाला विसरून थोड़े थाम्बयाचे आहे

श्वासांच्या गजरात हरावायाचे आहे
आठवनींच्या वनात हिण्डआयचे आहे
फ़क्त एकदा जगण्याला शोधायचे आहे

वासरासराखे मुक्त संचारायाचे आहे
दिनाचार्येच्या काट्यानना स्तब्ध करायचे आहे
फ़क्त एकदा रडताना हसायचे आहे

आहे का रे अशी कुठली जगा इथे
एकाच क्षण आयुष्यात ने मला तिथे

जवळ घेतले मिठीत मी तिला
क्षणात बदलला आसमंत सारा
माहीत नाही तीच का ही जागा
पण ओल्या नज़रान्नी अणि हसनारया ओठांनी दिला हाच इशारा

Saturday, December 3, 2011

प्रेम म्हणजे ............................

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

प्रेम म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......

|| निशब्द भावना ||

          
निशब्द भावना हि अर्थास जन्म देते |
प्रीतीच्या चाहुलीने मन ओसंडून येते |

भेटीच्या ओढीमध्ये क्षण हळुवार सरू लागतात |
काळजाचे ठोके अपोआपच वाढू लागतात |

आतुरतेने वाट पाहून तो क्षण सत्त्यात उतरतो |
हलकाच हाथ तुझा माझ्या हातामध्ये येतो |

स्पर्श तुझा मानस माझ्या गुदगुल्या करून जातो |
डोळ्यांमध्ये जसा मी तुझ्या नकळत हरून जातो |

वर्णनात तुझ्या काही मन माझे पूटपुटते |
कल्पना माझी जशी एका च्याचित्रामध्ये उतरते |

माऊ गुलाबी ओठ तुझे जसे मधुरसाचे प्याले |
मंजुळ तुझ्या आवाजने माझे देहभान हरपुनी नेले |

निशब्द भावनेला जसे पंख फुटून गेले |
सरता ते क्षण शरीरावर रोमांच सोडूनी गेले........!!!!!!

Thursday, November 24, 2011

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच……. 
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..
चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..
अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस
निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!

Tuesday, November 15, 2011

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
तुझ्यासाठी प्रेमात काही ही करेन असे मी बोलनार  नाही, 
पन तुझ्या प्रेमात काही कमी पडू देणार  नाही.
तुझ्या साठी ताजमहाल बांधण्य इतका मी श्रीमंत नाही,
पन ताजमहाल पेक्षा मोल्यावान आहे माझ तुज्या वरील प्रेम.
तुझ्या साठी मला प्रेमात जीव देता येणार नाही,
पन तुझ्या साठी प्रेमात जीव घेण्या इतकी हिमत आहे.
नको बघू माझ्या प्रेमाची परीक्षा,
कारण तुझ्या प्रेमासाठी देईन मी जगाला शिक्षा.
जगात खूप आहेत माझा सारखे प्रेम करणारे,
पण कमी आहेत माझ्या सारखे कमी बोलणारे.
तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणार
तुझा आणि फक्त तुझाच...................

स्वप्नी माझ्या येऊन तू

स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो !!

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!

Friday, September 30, 2011

अशिच येशिल तु तेव्हा

अशिच येशिल तु तेव्हा
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर्ग हि फिका पडेल तेव्हा......

आपलंही कुणी असावं.......................................

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

प्रेमात पडलं

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात

प्रेमभावना

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देसील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसाव्शील का ?
माझ्या मनातील ......................

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या जीवना मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील.................

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छा पुरती तू पुढे येशील का?
माझ्या मनातील............

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

मनाला एकदा आसेच विचारले

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

Thursday, September 22, 2011

एक कथा...


त्याला ती एका पार्टीत भेटली.
खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.
ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.
त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच!
तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!!!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,
'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?'
तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.
ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.
या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!!!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.
कॉफीची ऑर्डर दिली.
पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता.
आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.
झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!!!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.
त्यानं वेटरला हाक मारली.
वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.
तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!'
सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.
विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.
तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला.
त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला!
ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क  मीठ!
अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!!!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच  आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.
खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या  कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्रिये, मला माफ कर!

आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो...

पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...

केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!


प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!

त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.

आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...

खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!

पण मला तु खुप आवडतेस...

आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...

...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे  नाही तर हे खोटेपणाचं  ओझं मी पेलू शकणार नाही!

प्लीज - मला माफ करशील?"

तुझ्या रुपात

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..
अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..
१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.
ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..
तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो…तो म्हणाला.
ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?…
आय नो.. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल…तुला संसारा साठी.
त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन…
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. …..
continue…..

ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.
१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.
कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.
अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..
जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता…
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे… तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..
तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर…. वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि…ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..
तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.

टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,
सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
--
--
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणी मात्र तुज्याच आहेत....