NiKi

NiKi

Monday, January 30, 2012

मन नाहि था-रावर
चित्ती खळबळ माजते
उभ्या आयुष्याचे सार
वेडि कविता मागते….


मुक्तछंद ना गझल
चारोळिहि ना सुचते
उगा जुळविता शब्द
भावनाचे हसू होते….

मग चित्तारते डोळे
मी ग माझ्याच मनाचे
अश्रू कागदि काढता
स्मित ओठावरि येते….


ओल्या आसवाची शाई
लेखणी ती पाझरते
पानं भरतात जशी
मन हलके ग होते….

हिच जगण्याची कला
काहि घेते काहि देते
हेच आयुष्याचे सार
माझी कविता सान्गते….

No comments:

Post a Comment