NiKi

NiKi

Wednesday, September 26, 2012

कधी कधी कळतच नहीं आपण काय करतोय,
नकळत कुणाच्या भावविश्वात असे रमतोय,
वाटते की तो मार्ग आपला नाही,
पण न राहूनही मन तिकडेच वळतय,
काय सांगावे मनाला काहीच सुचत नाही,
काय म्हणावे याला हेच कळत नाही,

प्रित अशी ओढत घेवुन जाते,
साद तिची कानी एकु येते,
नाद असा घुमतो हा तिचा,
...
मन माझे बहरून जाते,
वेडावलेले मन थांबेल कसे,
तिच्या येण्याची फ़क्त वाट पाहत असे,

असेच होते जेव्हा प्रेम होते,
अनोळखी मन आणि नविन नाते,
हावी हवीशी वाटते ती प्रत्येक आठवण,
फ़क्त तिचे रूप आणि मनातील साठवण,
प्रत्येकाच्या जीवणात ही वेळ येते,
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते,
प्रेम हा वेड्यामनाचा खेळ असतो,
कुणा एका अनोळखी व्यक्तिशी झालेला मेळ असतो......

No comments:

Post a Comment