खुपदा विचार केला
पण उपयोग नाही झाला
कसे रहावे एकांतात
भरपूर काही आहे जीवनात
कारण ............
काही शब्द असतातच असे
की ते नेहमीच एकावेसे वाटतात
काही नाती असतातच एवढी गोड
की ती कधी संपूच नये असेच वाटते ...
आणि काही माणसे असतातच
एवढी आपली की ती नेहमीच
आपलीच रहावी अगदी शेवटपर्यंत .......
जगात एवडे सगळे असताना मग
एकांताची काय गरज .............
संकटे आणि उदासीनता सोडून
जगणे शिका कारण आयुष्य हे फार सुन्दर आहे
त्याला योग्य दिशा दाखवा ..........
No comments:
Post a Comment