NiKi

NiKi

Thursday, December 29, 2011

गंध गंधित माझे स्वप्नं,मोगर्याच्या गजऱ्या परी,
दवीत ओले ते क्षण,पहिल्या सरी पावसा परी;
उंच उडी मी आभाळी,कधी पर्वती,कधी खोल दरी,
कायम ठोके चूकवी आत,धडधड वाजती या उरी;
दूर दूर ते नगर,हिरवळ भोवती वाहती झरी,
चिमुकले ते गाव असे,नसे आधुनिक हवा जरी;
गोड ते सखे सोयरे,प्रेम वसे घरोघरी,
ओलावा असे नसनसात,माणुसकीच्या परोपरी;
बाला लावण्य ओथंबल्या,लाज पदर झाकून जरी,
स्मित लपवून ओठी,पळती वाजवून पैंजण तरी;
रसाळ तरुण्यीत ताठीत तरुण,पुरुष बाणा दिसे खरी,
घायाळ होती लज्जित तरुणी,धसे त्याची नजर सुरी;
भिजले तारुण्य वाहे अंगी,भेटी दोघे तळ-काठा वरी,
तुडूंब भावना उत्तुंग स्वप्ने,पाहती नयन ते भाव भरी;
एक आगळे जग थाटवू,बांधून घरटे,चार करी,
काडी काडी जमवू दुनिया,म्हणती लोक आगळी खरी;
आळस देऊन उठी मी,भासे स्वप्नं होते नदी तीरी,
ओलावून गेले चिंब मजला,कुठले थेंब हे गादी वरी..!

“एक कळी स्वप्नी आज…!”


आज न जाणे कुठली हवा,चित्त थंडावून गेली,
आगळीच कल्पना जणू, मनी भंडावून गेली;
कसा माझ्यातला मी, सहज भुलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

नवे नाते कुठलेसे,धागी बांधून गेली,
नवीच दरवळ भोवताली,काहीशी गंधून गेली;
स्थिरतेतही झुला झोकी,हवी झुलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

दोन ओठास चार,ओठी जुळवून गेली,
हातून माझ्या कुणास,गजरा मळवून गेली,
चंचल मनास शांतवून,भाव स्थुलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

उघड्या छाती मखमलीस,हात फिरवून गेली,
माझ्या अहं-पणास,स्वाधिकार मिरवून गेली;
चुटकी वाजवून अवाक,नजरेस हलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

मोगरा,निशिगंध काहीच,न जाती सांगून गेली,
मंद सुगंध दवीत,अंगी आन्गुन गेली;
अंग फांदीस सुक्या,रोमांच फुलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

शहार्त्या थंडी रेशमी,उब गर्मावून गेली,
स्व-व्याकुळता मिठी माझ्या,नजरी फर्मावून गेली;
उत्तुंग भावनि अधिकच,खपली उलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

गोड झोपी पापणी,अधिक लवून गेली,
नित्य कोरडी रजनी,आज दवून गेली;
गझलून रात्र माझी,दाद डूलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
फुलांनी फुलांची मुलाखात घ्यावी...
वेळेआधी कळी ही आपसूक खुलावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!

दिशा हरेक तुझे गुण गात बसावी...
सावलीत तुझ्या घुटमळून रहावी...
वा-याने गंधासवे ही खबरबात न्यावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!

थेंबात ओठांवरल्या तृणपत्रे नहावी...
खुलवून हिरवळ तरारून जावी...
तुझ्या चिंब देहांत लतिका भिजावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!

बेधुंद रानोवनी मज तूचं दिसावी...
जणू शालू हिरवा नेसून यावी...
पानापानावर तुझी ही मोहोर उमटावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!
माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते
कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!
नाही विसरू शकत मी तुला....
नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...
पानगळ कधीच झालेली
तुझ्या जाण्याने...
मी बसलेय कुरवाळत त्या
पाचोळ्याला...
बघत पान विरहीत वृक्षाला....
सांज येते गारठा वाठतो
तु नसतोस शाल बनायला...
तुझी आठवण येते नकळत
आपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....
चांदण्या हासतात... चंद्र खुणावतो...
लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...
बघ... आलीच तुझी आठवण...
खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...
कित्येक ऋतु बदलले..
तरी मी तिथेच पाचोळ्यांशी खेळत...
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत...
नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना
रंग माझा तुला ! गंध माझा तुला !
बोल काहीतरी ! बोल माझ्या फुला !

सांग लाजूनही नाव आतातरी;
एक खोळंबले गीत माझ्या उरी;
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला !

वेळ जादूभरी .... ही गुलाबी हवा !
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा !
भास झाला खरा ! श्वास झाला खुला !

हाय, माझी तुझी भेट झाली अशी :
शीळ यावी पुढे चांदण्याची जशी.
सांग, सोडू कसा हात हातातला !

Wednesday, December 28, 2011

रात्र माझी झरत जावी तुझ्या डोळ्यांत..
झिरपावी तुझ्या मनात,
आणि मग सुंदर सरोवर तयार व्हावं..
मुग्ध करणारं तुला अन् मला...
रात्र सरावी अर्धी तुझ्या डोळ्यांत,
तुझ्या स्वप्नांत,
अन् शांत निशा अनुभवावी दोघांनीही..
आणखी कुणीच नसावं जगात,
त्या धुंद रजनीला चांदण्यांची कड लाभलेली..
ऐकत रहावी स्पंदनं आपल्या हृदयातली,
सगळ्या भावनांचे अर्थ विनाशब्दच कळतील..
रातराणीचा सुगंध तुझ्या श्वासांतला,
मी माझ्या गात्रांत भरुन घेईन..
अन् अमृताचा ओलावा तुझ्या डोळ्यांतला
शोषून घेईन माझ्या कणाकणात..
असं वाटतं,
तुला घेऊन जाता यावं कोणत्यातरी अनाम जगात..
आपलं दोघांच जग..
मी मिळ्वेन शाश्वत आनंद,
बकुळीची फुलं सगळी फुलून यावीत..
त्यांचा गोडवा अन् गुलमोहराचा वणवा,
 नसानसांत पसरावा..
अन् प्रत्येक अणूरेणू उत्तेजित व्हावा,
प्रत्येक क्षण न क्षण...
तुझ्याच्सोबत जगता यावा,
चालत राहावं तुझ्याचसोबत..
क्षितिजापार.....
पाय थकेपर्यंत,
वाट संपल्यावरही...
आयुष्याच्या अंतापर्यंत...
अशी माझी प्रत्येक रात्र,
तुझ्या असण्याने..
तुझ्या अस्तित्त्वाने..
प्रकाशमान होऊ दे....
नुसत्या हिरवळीला अर्थ नाही,जर त्यात फुलांची रंगत नाही,
निळ्या आकाशाला अर्थ नाही, जर उडत्या पाखरांची संगत नाही;
घाटी खडकांना ओलावा नाही,जर त्यात बरसणारी धबधब्याची धार नाही,
नुसत्या जिंकल्या बाजीला अर्थ नाही, जर त्यात हवी ती हार नाही,
त्या टप्पोर्या मोगरा कळीला मान नाही, जर तिचा गोवित गजरा नाही,
कोणत्याच कवी-कवितेला मान नाही,जर त्याला आदबीचा झुकता मुजरा नाही;
त्या रसाळ ओठांना किंमत नाही,जर ओठी पान-विड्याची लालीच नाही,
त्या गुलाबी कानांना नजरच नाही,जर लटकती त्यात बालीच नाही;
त्या पुरुष पूजेला अर्थ नाही,जर स्त्रीची अर्पित ओंझळ नाही,
त्या मृगनयनाला चमकच नाही,जर त्यात धारित काजळ नाही;
त्या नजरेला काय अर्थ, ज्यात प्रेम भावनेचा वचक नाही,
ती स्त्री-चालच नाही, ज्यात नखरेल लचक नाही;
त्या चंद्र-चेहेर्याला चमकच नाही,जर घसरती घन बट नाही,
त्या स्वभावाला चटक नाही,ज्यात रूसता बाल-हट नाही;
तुझ्या गं या ओतप्रोत सौंदर्याला,मानच नाही जर भोगता मीच नाही,
माझ्या या जीवनाला काय अर्थ,जर त्यात हि सर्ववर्णीत तूच नाही....!
गडे ...पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे
आज रातराणीचा सुगंध दरवळे...

तु मला भेटता स्वप्न वाटे खरे
तु मला स्पर्शिता अन् वाटे बरे
भेटलीस... तु जरि, आहेत अडखडे...

प्रीत माझी खरी हा विसावा खरा
येथल्या धुंद राती राहती घरा
पावले ..का चालती तुझ्या कडे...

सैल होता तुझी ही मिठी जरा जराशी
चंद्र जातो निजेला आभाळी उशाशी
सांगना ..स्वप्न माझे तुला कसे आवडे...

तु येण्याचा होता आभास हा
तु असण्याचा होता जरि भास हा
प्रेम हे ..ना समझे ना  कधी उलगडे...
तू बोलावे आणि मी ऐकत राहावे
थरथरणा-या ओठातून शब्द काहीच न निघावे.

थरथर तुझ्या ओठांची उघड बंद खेळ पापण्यांचा
हळूच सावरशील पदर उडणारा तुझ्या साडीचा.

आतुरलेले मन माझे शब्द ऐकण्यासाठी तुझे
ऐकताच शब्द भान विसरून जाई माझे.

थरथरणा-या ओठातून हळुवार शब्द निघू लागतात
नकळत माझ्या हृदयाला स्पर्श करून जातात.

खरच शब्दामध्ये प्रेम सामवले आसते का
वेड न होणारे मन सुद्धा मग वेड होवून जाते का.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
स्वत:पासून हरवत गेलोय
तुझंच स्मरण असते फक्त
सगळं काही विसरत गेलोय

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
मन तुझ्याचभोवती फिरते आहे
आकाशाकडे पाहत रात्री
स्वत:शीच उसासे भरते आहे

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
जीवन सुंदर झालाय माझं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
चिंब चिंब मन न्हालंय माझं

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
आयुष्याचे अर्थ कळाले
तुझ्या रूपानेच मला गं
प्रेमरूपी दैवत मिळाले!!

राधा-कृष्ण का विस्तार

राधा भगवान का नारी स्वरूप है। भगवान नारी व पुरुष दोनों है, वह एक ही है, लेकिन कृष्ण ने अपने स्वरूप का विस्तार कर लिया राधारानी और वह स्वयं गीता में वृंदावन की गोपियों में श्रीमती राधारानी मुख्य गोपी थी, दूसरी गोपियों की तुलना में राधारानी का स्थान अत्यंत महत्वपूर्ण था,क्योंकि राधा का प्रेम कृष्ण के प्रति दूसरी गोपियों से अलग था।

बिना राधा के कृष्ण का कोई अर्थ नहीं है और बिना कृष्ण के राधा का कोई अर्थ नहीं है। श्री कृष्ण की रास लीला धार्मिक श्रद्धा, प्रेम व भक्ति की अभिव्यक्ति है। राधा-कृष्ण का प्रेम एक दूसरे के प्रति पवित्र व श्रेष्ठ था।
राधा-कृष्ण की कहानियां अमर हो गईं,इनमें से एक बड़ी रोचक कहानी है...

राधा और कृष्ण का विवाह नहीं हुआ था परंतु कृष्ण का प्रेम राधा के लिए देखकर कृष्ण की पत्नियां राधा से ईर्ष्या करने लगीं। एक बार उन्होंने राधा को पीड़ित करने के लिए एक योजना बनाई, उन्होंने जलता हुआ दूध का गिलास राधा को दे दिया और कहा कि कृष्णा ने भेजा है। राधा ने वह दूध प्रेम के साथ पी लिया, जब कृष्ण की पत्नियां लौटीं तो उन्होंने देखा की कृष्ण के पूरे शरीर पर छाले हो गये। इससे पता चलता है कि कृष्ण तो राधा के रोम रोम में बस्ते हैं। गर्म दूध राधा को छू भी नहीं सका और कृष्ण को पीड़ित कर गया।

राधा कृष्णा का विवाह नहीं हुआ था पर उनके प्रेम ने एक दूसरे को बांध रखा है।

Tuesday, December 27, 2011

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..
प्रिये, या जळणाऱ्या दिव्याची वात आहेस तू ..
आयुष्यभर मिळणारी एक प्रेमळ साथ आहेस तू..

तुझ्या प्रीतीत आयुष्याचा एक एक क्षण माझा मोहरून जावा ..
तुझ्या मिठीत जाताना लव ना लव , शहारून यावा ..

तुझ्या गरम श्वासांमध्ये मला माझा ही श्वास शोधायचाय   ...
अन त्याच वेळी तुझ्या लाजऱ्या चेहऱ्यावरचा आनंदी क्षण ही टिपायचाय...

तुझ्या ओठान्मधले मधाचे थेंब मला हवे आहेत ..
तुझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण मला हवे आहेत..

ये प्रिये, आज दोघांमधले नकोसे अन्तर मिटवून टाक...
ज्योती मध्ये जळणाऱ्या पतंगाला तुझ्या प्रेमानेच उत्तर देऊन टाक..
तू असतानाचे माझे खूळ भलतेच होते,
तू नसतानाही माझे हाल तेच होते.

पापण्या मिटताच व न मिटताच तुझीच मूर्त,
आताही आहेस वा कल्पना, हे हि पेच होते.

आजही ओलेच आहेत भिजलेले क्षण कालचे,
तरी झेलण्या नव अमृतधारा ,अवसान उभेच होते.

काळ विरघळली काही फुले भेट होताना जरी,
तू काढून ठेवलेल्या फुलांचे ,सुगंध तसेच होते.

राप अजूनही जाणवतो अंगाअंगावर विस्तवाचा,
ओठांवर कोमल दाह  ज्यांचा , ते गुच्छ फुलांचेच होते.

स्पर्श झाला पदराचा तू सावरत जाताना उंबरठ्याला,
त्याचे हि रोमांच ,माझ्या रोमांचा सारखेच होते.

अजून लाजले होते खिडकीचेही गज काही,
त्यांनी मिटलेले दार ,आत्ताही बंद तसेच होते.
चंचल वारा धरणीतळा
खोडकर चंदा नभात रे
सांजसकाळी सजना माझ्या
राहतो तु मनात रे…..
धरणी अंबर पर्वत सागर
दिसते तु फुलात गं
सांजसकाळी सजनी माझ्या
राहते तु मनात गं…..

वारा वाहतोय जसा झुला झुलतोय जसा
तु राहतोय तसा अंतरी मंदिरी
नदी वाहते जशी गाणी गाते जशी
तु दिसते तशी लाजरी सुंदरी
पाऊस पहिल्या सरींचा आला
पडतोय थेंब जसा पाण्यात रे
सांजसकाळी सजना माझ्या
राहतो तु मनात रे…..

काय जादु तु केला
स्पर्श हळूच झाला
अंगअंगाने तुझ्या जसा
देह माझा हा चुंबीला
कुणी ऐकेल कुणी बोलेल
हळूच सांग कानात गं
सांजसकाळी सजनी माझ्या
राहते तु मनात गं...
माझ्यासाठी हे करशील ना?

भिजू नयेस म्हणून मी तुझ्यासाठी छत्री आणेन,

पण भिजण्याची गळ तू घालशील ना?

तुझ्याबरोबर मीही घाम गाळेन

पण एखादा थेंब टिपशील ना?

असाच खेचत राहिलास तर मी गुंतत जाईन

पण झालेला गुंता सोडवशील ना?

खांद्यावर डोके ठेवून अश्रू गाळेन

तेव्हा ओठांनी टिपून घेशील ना?
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
नजर हाक देताच मी,
हसत उमटली लाज गाली.

वाटतो कि स्पर्श व्हावा,
पापणीचा पापणीला,
हितगुज ओठात  व्हावे,
छेद द्यावा जाणीवेला.
स्पर्शाने जळलो त्या,
राख झाली मीपणाची,
आशेचा जळतो निखारा,
साचलेल्या राखेखाली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.

ते न स्वप्न जे नीज देते,
स्वप्न ते जे कि जाग देते.
विझल्या निखारयातही,
पुन्हा नवीन आग देते.
आस उठते पुन्हा नवी कि,
नजरच मग प्रतिसाद देते.
कोमेजलेली हिरवी पाने,
पुन्हा टवटवीत झाली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.

अक्षर ना ते वर्नाक्षरांत,
सूर ना तो साप्त्सुरांत,
तारा ना तो या नभात,
स्वप्न केवळ ते या लोचनात,
स्पर्श नको तो विजेचा,
मार्ग नको आडवाटेचा.
समागम झाला नवा हा,
निश्कामतेची ज्योत तेवली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
अशीही एक रात्र यावी
सोबत तुझ्या जी विरून जावी
चांदण्यांच्या विश्वात  रमताना
साथ तुझी मला निरंतर मिळावी........

एकाच त्या मृदू रात्री
मोहरलेल्या वृक्षान भोवती
घ्यावेस तू मला मिठीत तुझ्या
विरून जावी माझी सखोल सावली

त्याच कोमल मिठीत तुझ्या
मी पूर्णतः स्वतःस विसरावे
गुलाबी स्पर्शाने तुझ्या मग
अनाहूतपणे तू मला जागे करावे

तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी
पाउल खुणा मागे सारून
रात्र हि ती विरून जावी................

Monday, December 26, 2011

रंग माझे असले तरी चित्र मात्र तुझेच आहे
झोप माझी असली तरी स्वप्न मात्र तुझेच आहे.

           मन माझे असले तरी भावना मात्र तुझ्याच आहेत
           भुंगा मी असलो तरी कळी मात्र तूच आहेस.

शरीर माझे असले तरी मन मात्र तुझेच आहे
वेडा मी असलो तरी वेड मात्र तुझेच आहे.

           जगत असलो मी तरी जीवन मात्र तुझेच आहे
           कितीही दूर असलीस तरी आठवण हि तुझीच आहे.

लिहित असलो मी तरी शाही मात्र तूच आहेस
कवी मी असलो तरी कविता मात्र तुझीच  आहे.
आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

हातात माजा प्रीतिचा नेहमीच, तुजा हात दे !

क्षण विरहाचे विसरून आता, मिलनाचे वेध दे !

तुज्या ह्रदयात माज्या प्रीतिची, कली अशीच उमलू दे !

माज्या श्वासात तुज्या सुगंद्याची, जाणीव माला होऊ दे !

नजरेत तुज्या फ़क्त मला, माजी प्रतिमा पाहू दे !

मनात तुज्या नेहामिसाठी, फ़क्त मलाच राहू दे !

आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

मी दुसर काहीच मागणार नाही, फ़क्त प्रीतिचा हात दे !
शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||

डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच गंध || २ ||

तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||

तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||

म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||

तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ
थांबून क्षणभर ,
एकदा तरी बघ मजकडे
विसरून स्वतःला,
जगणे मन धुंद वेडे
तुझ्या प्रीतीची आस मज ,
प्रीत आपुली बहरू दे
उंच झोके अशी घे
गर्द सावली बेभान होऊ  दे
नभ व्याकूळ तुज साठी बस ,
एक थेंब मज दे
भिजवून टाक मग माझे अंगण,
भिजतील गोड बंध ते
मातीचा मधुगंध सखे,
खोल उरात घेऊ दे
तुज प्रतिबिंब मावळतीला ,
मज सागरा समरूप होऊ दे
सुर्योदयास  परत नव्याने ,
क्षितिजावर ये
येशील तेव्हा , मी आलेय ,
एक साद मज दे !!!

नाजुकसे क्षण टिपलेले!

तुझ्या सोबत चालताना
तुझ्या केसांची बट हलताना
सैरावरा पाखरं होई
तु जवळ असताना
अचानक तुझं थांबणं
आठवलं काहि जणु
हिच ती वेल सजना
चुरडले फुल गाली जणु
मला खुप जगायचयं
तुझ्या सोबत राहायचयं
आयुष्यभर
जगुन म्हातारं व्हायचयं
आठवणीत रमुन जायचयं
आयुष्यभर!
म्हणताचं तिच्या डोळ्यात पाणी यावं
माझ्यावरल्या प्रेमाची साक्ष द्यावं
अलगद डोळे पुसतानां
प्रेम माझं घट्टं घट्टं व्हावं
एकचं उत्तर यावं
होय असंच होईल , राणी
तिनं डोक माझ्या खांद्यांवर ठेवाव.
कातरवेळ बघण्यासाठी,
मी हलकंच चुंबन घ्यावं
माझ्या होकारासाठी!
तिझे डोळे खूप गहिरे, खोल कोठे तरी जाणारे
आर्त सूर माझ्या विरहाचा, मनापर्यंत पोहोचवणारे

प्रत्येक क्षणाला माझ सुख, माझा आनंद पाहणारी ती
माझ्यावर कदाचित माझ्याहून अधिक प्रेम करणारी ती

काहीही करून मला मिळवू पाहणारी तीझी सततची धडपड
शांत बसूनही विचारांची अखंड चालणारी तीझी बडबड

खूप स्वप्न रंगवत जातो माणूस परिस्थितीप्रमाणे
तिने मात्र जपल आहे एकच स्वप्न तिझ्या आवडीप्रमाणे

संस्करांच्या नावाखाली आजही बळी दिले जातात प्रेमाचे
रजनीशिवाय अर्थच काय चंद्रमाच्या अस्तित्वाचे...?
मर्यादांचे कुंपण !!

मनपाखरू माझे,
तुझ्याकडे यायला उडे,
त्याचवेळी नेमके,
मर्यादांचे कुंपण पड़े !!

चल सख्या दूर जाऊ,
क्षितिजाच्या पलिकडे,
नसतील जिथे आपल्याभोवती,
मर्यादांचे कड़े !!

असेल केवळ निरभ्र आकाश,
आणि असेल शांततेचे कोडे,
पडतील तेव्हा अंगावरती,
चांदण्यांचे सडे !!

हात हाती घेउनी,
डोळ्यात डोळे घालू गडे,
आज करू या मोकळी,
आपल्या भावनांची कवाडे !!

Saturday, December 24, 2011

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या  आटवणीनमध्येच मी रमलेला असतो.

वाट पाहत असताना,
वेळ  जणू कासव होतो,
घड्याळ त्याच्या टिक टिक आवाजाने,
माझी छेड कडू पाहतो,
त्यांना ठाऊक असतेना,
मी तुझी वाट पाहत असतो.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

दर सेकंद, मिंट, तास मोजून काडतो,
तू सोबत नसताना हि,
तू सोबत असल्यासारखे,
तुझ्याशी गप्पा मारतो.
दिवस भराच्या माझ्या गमती जमती,
तुला सांगण्यासाठी साठून ठेवतो.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

खूपच जार आठवण आली,
तर घट डोळे मिटून,
माझ्या आठवणीतल्या तुला,
माझ्या पापण्यांचे परदे करून,
चलचित्र सारखे पाहतो.

पाहतो,
तुझे सारखे केसातून हात फिरवणे,
लाजेने डोळे खाली टाकून,
चेहेरा हाता आढ लपवणे,
आणि, हळूच मिश्कील हसणे.
असे तुझे सुंदर दृश्य पाहण्यात,
मी माझे मान रमव्तोह.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

जेव्हा तो  क्षण;
तुझ्याशी बोलण्याचा,
जवळ येतो.
हृदय  अति वेगाने धाऊ लागतोह,
मान प्रसंनचीत होतो,
मी एक विलक्षण आनंद अनुभवतो,
कारण काही क्षणात,
मी तुझ्याशी बोलणार असतोह.
अश्या दुराव्याने वाढलेलं माझ प्रेम,
मी तुला देणार असतो.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या आठवणीनमधेच  मी रमलेला असतो.
होऊनी वाळू मी किनारी असावे              
स्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे              
कधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे              
संध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे              
              
कधी पुनवेचे रात बनून फुलावे              
लाटेस तुझ्या वर्ख चांदीचे चढावे              
कधी रौद्ररुपी तू खवळून उठावे              
मी किनारी खडक ते तडाखे प्राशावे              
              
तुझ्या प्रतिमेच्या  छाया साकार व्हाव्या              
भेटी गाठी माझ्या मनी जगाव्या              
अर्पायला सरिता जीवन इथे येता              
मी त्या समर्पणाची  सीमा असावे              
              
अशी नाती वेड्या नीतीची आगळी              
होऊन किनारा मी तटी बैसलेली              
आहे फिर्याद आणि मर्यादा माझी              
मी रिवाजाला सोडून का तुला भजावे ?              
              
किती रात्री जागल्या तुझ्या गर्जनेत              
किती काळ बैसले तुझ्या साधनेत              
देऊ केलेस मज पायाशी स्थान जे              
त्यालास जगणे किनारा म्हणावे
पावसाच आणि प्रेमाच
काहीतरी नात असाव जवळून...
उगाच का पहिल्या सरित
विरह येतो दाटून...

पानीदार पापण्या आज का
नजरेसमोरून जात नाहीत...
लवलवनार पात आज कस
दिसत नाही...

पहिल्या सरीच्या म्रुदगंधाला
तिच्या येण्याचा अर्थ का यावा..
रोज उमलनार्या फुलात
तो का नसावा...

कडाडनार्या विजेत तिची
आर्त साद का वाटावी...
रोज लुकलुकनार्या चांदण्यात
का नसावी...
वैसे तो सभी रिश्ते-नातों का अपना विशेष महत्व है, सभी के अपने अलग कर्तव्य और अधिकार हैं। परमात्मा द्वारा किस परिवार में हमें जन्म दिया गया है उसी के अनुसार हमारे सभी रिश्ते-नाते निर्धारित होते हैं। जन्म से जुड़े रिश्तों के अतिरिक्त एक रिश्ता है प्रेम का। किसी से नि:स्वार्थ प्रेम का रिश्ता सदैव पूजनीय है यह संदेश दिया है श्रीकृष्ण ने। श्रीकृष्ण और राधा इस बात का उदाहरण है कि नि:स्वार्थ प्रेम हर रिश्ते से बढ़कर पवित्र और महान हैं। इसी वजह से श्रीकृष्ण की पूजा राधा के साथ ही की जाती है।

रिश्तों में माता-पिता और गुरु का स्थान ईश्वर के समान ही बताया गया है और यह लोग सदैव आदर और मान-सम्मान प्राप्त करने के अधिकारी भी हैं। इनका अनादर करने वाले से भगवान कभी प्रसन्न नहीं हो सकते। स्वयं भगवान विष्णु ने जब-जब अवतार लिया है उन्होंने माता-पिता और गुरुदेव के प्रति श्रद्धा और भक्ति रखने का ही संदेश दिया है। कोई भी व्यक्ति जन्म से मृत्यु तक असंख्य लोगों के संपर्क में आता है। कुछ विशेष लोगों से उसे स्नेह हो जाता है, कुछ मित्र बन जाते हैं। इन सभी लोगों में किसी खास शख्स के प्रति हमारा मन नि:स्वार्थ भाव से प्रेम करने लगता है। ऐसा ही प्रेम था राधा और श्रीकृष्ण के बीच। इनका प्रेम की कोई सीमा नहीं है, दोनों ही एक-दूसरे से असीम प्रेम रखते है। इनके प्रेम में कोई स्वार्थ नहीं कोई अपेक्षा नहीं है।

गोकुल में ऐसी कोई गोपी न थी जिसे श्रीकृष्ण से प्रेम न हो। हर गोपी का प्रेम पवित्र और भक्तिपूर्ण था। सभी श्रीकृष्ण को अपने प्रियतम के रूप में ही देखती थी और श्रीकृष्ण भी सभी को वैसा ही स्नेह प्रदान करते थे। इन सभी गोपियों में राधा का स्थान सर्वोच्च है। राधा का प्रेम इतना गहरा और महान है कि उन्होंने अपना सर्वस्व श्रीकृष्ण पर न्यौछावर कर दिया और अपने मन को पूरी तरह से श्रीकृष्ण के चरणों में लगा दिया। श्रीकृष्ण भी राधा के प्रेम में पूरी तरह से रंग गए।

श्रीकृष्ण और राधा के प्रेम की गहराई को दर्शाते कई प्रसंग हमारे धर्म ग्रंथों में दिए गए हैं। उन्हीं के अनुसार एक बार राधा से श्रीकृष्ण से पूछा- हे कृष्ण तुम प्रेम तो मुझसे करते हों परंतु तुमने विवाह मुझसे नहीं किया, ऐसा क्यों? मैं अच्छे से जानती हूं तुम साक्षात भगवान ही हो और तुम कुछ भी कर सकते हों, भाग्य का लिखा बदलने में तुम सक्षम हों, फिर भी तुमने रुकमणी से शादी की, मुझसे नहीं।

राधा की यह बात सुनकर श्रीकृष्ण ने उत्तर दिया- हे राधे, विवाह दो लोगों के बीच होता है। विवाह के लिए दो अलग-अलग व्यक्तियों की आवश्यकता होती है। तुम मुझे यह बताओं राधा और कृष्ण में दूसरा कौन है। हम तो एक ही हैं। फिर हमें विवाह की क्या आवश्यकता है। नि:स्वार्थ प्रेम, विवाह के बंधन से अधिक महान और पवित्र होता है। इसीलिए राधाकृष्ण नि:स्वार्थ प्रेम की प्रतिमूर्ति हैं और सदैव पूजनीय हैं।