NiKi

NiKi

Friday, March 30, 2012


रोज काहीतरी लिहायचे
अस कधीच ठरवल नाही
पण लिहायला बसलोच तर
शब्दच पाठ सोडत नाहीत

कवितांच्या माग लागण्याची
वेळच कधी आलीच नाही
डोळे मिटले कि मनातले भाव कळतात
यमक जुळायला शब्द कमी पडत नाहीत

मनाचा तारू असा उधळतो
कि; लगाम त्याचा फुका ठरतो
आठवणींच्या गुंत्यात येवून
“माझ्या लेखणीतून…” स्थिरावतो

No comments:

Post a Comment