रोज काहीतरी लिहायचे
अस कधीच ठरवल नाही
पण लिहायला बसलोच तर
शब्दच पाठ सोडत नाहीत
कवितांच्या माग लागण्याची
वेळच कधी आलीच नाही
डोळे मिटले कि मनातले भाव कळतात
यमक जुळायला शब्द कमी पडत नाहीत
मनाचा तारू असा उधळतो
कि; लगाम त्याचा फुका ठरतो
आठवणींच्या गुंत्यात येवून
“माझ्या लेखणीतून…” स्थिरावतो
No comments:
Post a Comment