कविता मला कधीही सुचतात.
झोपायचा आधीही
परीक्षेच्या मधीही
कविता करायच्या म्हणाल्या तर त्या होत नसतात
त्या दिव्यातील ज्योत असतात
तेल घातल्याशिवाय दिवा लागत नाही
शब्द जूळल्याशिवाय कविता स्फुरत नाही
कविता प्रत्येकाला येत असतात
वास्तवतेपेक्षा दूर नेत असतात
शब्द प्रत्येकाच्या मनात ठसलेले असतात
अगदी रुतून बसलेले असतात
एक एक शब्द वर घेऊन जूळवायला आला
की समजाच तुम्ही कवी झाला.
No comments:
Post a Comment