NiKi

NiKi

Tuesday, March 20, 2012



मनालाही असातान मन तर बरं झालं असतं,
कदाचित हे वेडं मन तेव्हा कुणावरच आलं नसतं,
नसतं आवडलं कुणी इतकं,
आणि नसतं जपलं खरच इतकं कुणी कुणाला,
तळमळल नसतं कुणी आणि
कीव आली असती मग मनाचीच मनाला.
मनालाही असतं मन तर बरं झालं असतं....!!!

नसले दाटले अश्रू नयनी,
एव्हाना कातरवेळहि कडवी नसती,
कैद असती मग मनाच्या पिंजऱ्यात, ,
हि स्वप्नपक्षीहि उडली नसती,
मनालाही असतं मन तर बरं झालं असतं....!!!

आताश हे प्रश्न एवढे
तेव्हा नक्कीच जडले नसते,
विचित्र नात्याचे हे कोडे
तेव्हा मात्र पडलेच नसते,
कसं असतं हे विश्वं जेव्हा
प्रेमात कुणी कुणाच्या पडलं नसतं,
आणि वेळ आली असती तर
मनानीच मनाचं मन मारलं असतं
मनालाही असतं मन तर बरं झाला असतं.....
कदाचित हे वेडं मन तेव्हा कुणावर आलं नसतं......!!!!!

No comments:

Post a Comment