NiKi

NiKi

Saturday, April 21, 2012



ना तुला भेटूनही ही ओढ वाटावीच का?
अंतरी माझ्या तुझ्या ही ज्योत पेटावीच का?

सूर जे नाही मिळाले शोधुनी दाही दिशा
खिन्न माझ्या अंतरीची धून तू गावीच का?

जीव सांभाळून आहे कोणत्या आशेवरी?
वाळवंटी ही सुखांची आस स्पंदावीच का?

बोललो मी एवढा की शब्द सारे संपले
मी तरी बोलायचे ते बोललो नाहीच का!

स्वप्न जे जे पाहिले ते जाळुनी गेले तरी
आजही स्वप्नांधतेचे पारडे भारीच का?

No comments:

Post a Comment