NiKi

NiKi

Friday, April 13, 2012



चारोळ्यांच किती चांगलं असतं
प्रत्येकाच्या मनासारखं वागतात
मनातल्या प्रत्येक भावना
मोजक्या शब्दात सांगून टाकतात!
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरताना
मला काहिच आठवत नाही
सर्व आठवणी शब्दात मांडतो
कारण मनात मी काहिच साठवत नाही
-----------------------------
चारोळ्या आपल्या जीवनात
फार महत्वाची भूमिका बजावतात
एकूण एक शब्दतून आपल्याला
जुन्या आठवणीत पाठवतात
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरायला
प्रत्येकाला आवडत असतं
दुःखाच्या क्षणी आपल्याला ते
सुखाच्या गावात पाठवत असतं

No comments:

Post a Comment