सखे, आठवण येता तुझी,
मन माझे उदास होत !
आनंदाने भरलेल्या जीवनात सुद्धा,
काहीतरी 'उण' वाटत रहात !
तुझ्या बरोबरचे ते क्षण,
पुन्हा मज अनुभवावेसे वाटतात !
लख्ख मोकळ्या मनात माझ्या,
मैत्रीचे ढग दाटून येतात !
रखरखीत दु:ख्खाची उन्हे जाऊन
निर्मळ प्रेमाची घनदाट छाया
दोघांच्याही जीवनात आली होती !
त्या रमणीय अपुल्या सर्व क्षणांची
उजळणी आजही मी मनी करतो,
रोजच्या संसाराच्या धावपळीत हि,
हृदयात दडवून मी 'जपून' ठेवतो !
नातं आपल्या "राधा-कृष्णी" मैत्रीचे
मनी माझ्या आजन्म राहील !
आठवण येता कधी माझी तुला
डोळ्यात हमखास माझ्याही पाणी येईल ...!!!
No comments:
Post a Comment