NiKi

NiKi

Thursday, August 30, 2012

सायंकाळी सागर किनारी एकांती ,

भेटायचं मला तिने ठरवलं होतं !

पण बराचवेळ तिची वाट पाहुनि ,

आनंदावर माझ्या विरझण पडलं होतं !








' का आली नाही? ' मनी विचार करता ,

'सत्य' लगेच समोर उभं ठाकलं !

स्वप्नात किती राहशी म्हणता ,

खिजवून मजला छद्मी हसू लागलं !

आशा वेडी स्वप्ने दावते ,

परिस्थिती पासून तुजला दूर लोटते !

स्वप्न कधी सत्यात नुतरते ,

शहाण्या माणसास पार वेड लावते !

अंतर्मनाने सत्यास साफ नाकारले ,

श्रद्धा माझी माणसातल्या आनंदी होण्यावर !

बदलावयाचे परिस्थितीला मी स्वीकारले ,

सर्वस्व अर्पुनी सत्यवत स्वप्नांस आणण्यावर !

तोच आभाळी मेघ दाटले ,

गर्जुनी वार्यासवे रिमझिम बरसू लागले !

उदासपणे होता माघारी जाणे,

मागुन कुणीतरी मजवर छत्र धरिले !

 सॉरी,लेट झाला ' ट्राफिक मध्ये अडकले,

म्हणत तिने छत्रीत जवळ खेचले !

आनंदाने माझी कळी खुलली ,

खरोखर स्वप्नवत अमुची भेट झाली ...!

No comments:

Post a Comment